शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

पक्षाशी बंडखोरीची अजित पवारांना शिक्षा, की मंत्रीपदाचे बक्षीस !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 11:08 IST

काकांनी आपली चाल हाणून पाडल्याचे लक्षात येताच अजित पवार पुन्हा एकदा राष्ट्रवादीला शरण आले. अजुनही अजित पवारांच्या समर्थकांना भाजपमध्ये जावून परत येण्याची त्यांची मुद्दामहून खेळलेली चाल वाटते. मात्र यात तथ्य दिसून येत नाही.

मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्तेत बसायला मिळेल या आशेने राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष पूर्ण रिकामा होतो की, अशी शक्यता निर्माण झाली होती. तर सत्ताधारी भाजपकडूनही राष्ट्रवादीच्या गळतीवर टीका करण्यात येत होती. मात्र शरद पवारांनी पक्ष सोडून जाणाऱ्या सर्वांना धडा शिकवला. अनेक गयारामांना पवारांनी पराभवाची धूळ चारली. पुतणे अजित पवार यांनी देखील गयारामांच्या पावलावर पाऊल ठेवून बंडखोरी केली आहे. आता शरद पवार पुतणे अजित पवारांना देखील धडा शिकवणार की, राष्ट्रवादीत परतल्याबद्दल मंत्रीपदाचे बक्षीस देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शिवसेना एकत्र येऊन  सत्ता स्थापन करणार हे निश्चित झाले असताना अजित पवार यांनी सकाळी भाजपशी हात मिळवणी करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. ही शपथ त्यांनी केवळ गटनेता म्हणून असलेल्या आमदारांच्या सह्यांच्या पत्राच्या जोरावर घेतली होती. अर्थात याला भाजपचं पाठबळ होतंच. मात्र हे प्रकरण न्यायालयात गेल्याने सरकार टिकण्याची मदार सर्वस्वी न्यायालयाच्या निर्णयावर होती. 

दरम्यान न्यायालयाने संविधान दिनाच्या दिवशी ऐतिहासिक निकाल देत भाजपच्या असंविधानिक कृतीला कचऱ्याची पेटी दाखवत निर्णय दिला. त्यामुळे अजित पवार यांचे भाजपच्या साथीत उपमुख्यमंत्रीपदी विराजमान राहण्याचे स्वप्न भंगले. मात्र त्यांच्या या निर्णयाने शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता. अजित पवारांनी सत्तेसाठी काकांशी आणि पक्षासोबत बंडखोरी  केल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र काकांनी आपली चाल हाणून पाडल्याचे लक्षात येताच अजित पवार पुन्हा एकदा राष्ट्रवादीला शरण आले. अजुनही अजित पवारांच्या समर्थकांना भाजपमध्ये जावून परत येण्याची त्यांची मुद्दामहून खेळलेली चाल वाटते. मात्र यात तथ्य दिसून येत नाही.

अपयशी बंडखोरीनंतर आता अजित पवारांच्या भवितव्याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहे. शरद पवार यांनी बंडखोरी करणाऱ्या अनेकांचा बंदोबस्त केला आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना पराभूत करून मोठा धक्का दिला. आता तोच न्याय पुतण्यासाठी राहिल का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. किंबहुना अजित पवारांना बंडखोरीची शिक्षा मिळेल की मंत्रीपदाचे बक्षीस असा प्रश्न राष्ट्रवादीच्या सुजान कार्यकर्त्यांना पडला आहे.