शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला अजित पवारांचा विरोध, पण...; स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 16:20 IST

एकीकडे योगींच्या "बटेंगे तो कटेंगे" या घोषणेचा विरोध केला असून दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "एक है, तो सेफ है" घोषणेचे समर्थन केले आहे...!

राज्यात विधानसभा निवडणुकीचा आखाडा चांगलाच रंगात आला असून सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून विविध प्रकारच्या घोषणाही दिल्या जात आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे' आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक हैं, तो सेफ हैं' या घोषणांची राजकीय वर्तुळात जबरदस्त चर्चा सुरू आहे. यासंदर्भात आता महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी भाष्य केले आहे. त्यांनी एकीकडे योगींच्या "बटेंगे तो कटेंगे" या घोषणेचा विरोध केला असून दुसरीकडे मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "एक है, तो सेफ है" घोषणेचे समर्थन केले आहे. 

अजित पवार म्हणाले, "देश एक राहिला तर सेफ राहील, यात काय खराबी आहे. काहीच नाही. आपण सर्वजण एक राहिलो तरच सेफ राहू. यात काय खराबी आहे. यात काय अडचण आहे. मला तर यात काही चुकीचे वाटत नाही. 'सबका साथ सबका विकास', सर्वांचा... सर्वांचा... सर्वांचा विकास. तसेच आपण सर्वजण एक राहिलो तर सेफ राहू." यावर 'बटेंगे तो कटेंगे'? असे विचरले असता, पवार म्हणाले, "हे चुकीचे आहे, काय 'बटेंगा कटेंगा', असे शब्द महाराष्ट्रात वापरण्यात काही अर्थ नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. महाराष्ट्रातील लोकांचा विचार वेगळा आहे. कदाचित, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश येथील लोकांचा विचार वेगळा असू शकतो. तो त्यांचा अधिकार आहे. महाराष्ट्रात असे चालत नाही."

"आमच्या महाराष्ट्रात शिव, शाहू, फुले आंबेडक यांची विचारधारा, शिव म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा चालते. ही विचारधारा कुणी सोडली तर महाराष्ट्र त्याला स्वीकार करणार नाही," असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

तत्पूर्वी, भाजप नेते योगी आदित्यनाथ आपल्या रॅलींमध्ये 'बाटेंगे तो कटेंगे'चा नारा देत आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक हैं, तो सेफ हैं’, असा एकतेचा संदेश देत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. तसेच, जाती-जातीत भांडण लावणे हा काँग्रेस पक्षाचा एकमेव अजेंडा आहे. SC, ST आणि OBC समाजाची प्रगती व्हावी आणि त्यांना योग्य सन्मान मिळावा, असे त्यांना वाटत नाही. लक्षात असू द्या, 'एक है, तो सेफ है' असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारyogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदी