शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

"चक्की पीसिंग, पीसिंग अँन्ड पीसिंग..."; जाहीर सभेत अजित पवार असं का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 18:08 IST

महिला अत्याचारावरून अजित पवार संतापले, नराधमांना फाशीवरच लटकवलं पाहिजे असं सांगितले. 

अहमदपूर - भारतीय न्याय संहितेमध्ये आता महिलांना अत्याचाराविरोधात घरबसल्या ई तक्रार नोंदवता येणार आहे. नवीन कायद्यात अशा प्रकरणी दोषींना फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा आहे. तो कायमचा वर गेला पाहिजे. त्याच्या पुढच्या ५० पिढ्या आठवल्या पाहिजेत, ही विकृती आहे. नराधमांना माफी नाही. शाळा, रुग्णालये, पोलीस ठाणे तिथेही कुठल्या पातळीवर हयगय होणार नाही. आता कुणी हयगय केली तर तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांनाही जेलमध्ये चक्की पीसिंग, पीसिंग अँन्ड पीसिंग असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले आहे. 

लातूरच्या अहमदपूर येथे जनसन्मान यात्रेवेळी अजित पवारांनीमहिला अत्याचारावर भाष्य केले. अजित पवार म्हणाले की, महिला अत्याचारात निष्काळजी करणाऱ्या अधिकाऱ्यांना सोडणार नाही. त्याच्या घरी बायका पोरं नाहीत का? या पद्धतीने वागता. बदनामी आमची होते. महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या असं आमच्या बहिणी सांगतायेत, काय तिचं चुकलं?. महिला अत्याचाराबाबत केंद्राने आणि राज्यानेही कायदे कठोर केले आहेत. या प्रकरणी कुणाचीही हयगय करायची नाही हे आम्ही ठरवलं आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच महिला, मुलींवर कुठे ना कुठे अत्याचार होतायेत. महिलांवरील अत्याचार अक्षम्य गुन्हा आहे. त्याला माफी नाही. दोषी कुणीही असू त्याला सोडणार नाही. सरकार येतील, सरकारे जातील पण महिला सुरक्षेबाबत कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य राहील. या नराधमांना फाशीवरच लटकवलं पाहिजे असं अजित पवारांनी म्हटलं.

दरम्यान, आम्ही 'माझी लाडकी बहीण योजना' आणली. या योजनेच्या माध्यमातून माझ्या बहिणींच्या बँक खात्यात प्रतिमहिना पंधराशे रुपये जमा करण्यास सुरुवात केली. या योजनेला बहिणींनी सुद्धा भरघोस प्रतिसाद दिला. तरुणांना प्रशिक्षण भत्ता देत आहोत. गोरगरिबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देत आहोत. शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं आहे. याशिवाय मधल्या काळात आम्ही कोतवालाचं मानधन वाढवलं, पोलीस पाटलांचं मानधन वाढवलं, अंगणवाडीचं मानधन वाढवलं. याप्रमाणे आम्ही निर्णय घेत राहू. महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रवासीयांना विकास पथावर पुढे नेण्यासाठी महायुती सरकारनं अनेक अभिनव योजना हाती घेतल्या आहेत. या योजना दीर्घकाळ सुरूच राहाव्यात, यासाठी तुम्हा सर्वांचा पाठिंबा आणि आशीर्वाद हवा आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना साथ द्या, विकास आम्ही घडवून आणू, हा माझा शब्द आहे असंही आवाहन अजित पवारांनी महिलांना केले.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारWomenमहिला