शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

राजीनामा देण्यापूर्वीच भाजपच्या गुजराती निरमा पॉवडरने अजित पवार 'क्लिन' ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 16:33 IST

खुद्द रावसाहेब दानवे यांनीच म्हटले होते की, आमच्याकडे गुजरातचा निरमा असून नेत्यांना त्या निरम्याने धुतल्यानंतरच आम्ही सोबत घेतो. त्याच निरम्यानं अजित पवार क्लिन झाले का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. 

मुंबई - महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथ अद्याप थांबलेली नाही. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या साथीत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय भूकंप झाला होता. आता त्याच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. किंबहुना भाजपचे सत्तास्थापनेचे स्वप्न भंगले आहे. मात्र अजित पवार यांचा भाजपसोबत जाण्याचा उद्देश साध्य झाल्याचे दिसून येत आहे. 

राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापन करणार हे स्पष्ट झाल्यानंतर अजित पवार यांनी तातडीने भाजपला पाठिंबा दर्शवित उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले होते. मात्र बहुमत सिद्ध झाले नव्हते. राज्यपालांनी फडणवीसांना 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती. अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांना फोडून भाजपला बहुमत सिद्ध कऱण्यास मदत करणार अशी शक्यता होती. मात्र शरद पवारांनी घेतलेल्या भुमिकेमुळे भाजपच्या महत्त्वकांक्षेवर पाणी फेरले गेले. 

दरम्यान अजित पवार गटनेते म्हणून काही आमदार घेऊन भाजपसोबत  गेले होते. मात्र ते आमदार पवारांच्या भूमिकेनंतर परत आले होते. तरी देखील भाजपला सरकार स्थापन्याचा विश्वास होता. त्यातच अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे असलेले आरोप आणि त्याची सुरू असलेली चौकशी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, भाजपच्या आरोपांमुळेच अजित पवार यांची चौकशी सुरू होती. ते अजित पवार भाजपमध्ये जाताच चौकशी बंद झाली होती. 

चौकशी थांबल्याने अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला. मात्र भाजपमध्ये जाताच क्लिनचीट मिळते, हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले. याआधी खुद्द रावसाहेब दानवे यांनीच म्हटले होते की, आमच्याकडे गुजरातचा निरमा असून नेत्यांना त्या निरम्याने धुतल्यानंतरच आम्ही सोबत घेतो. त्याच निरम्यानं अजित पवार क्लिन झाले का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.