शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

राजीनामा देण्यापूर्वीच भाजपच्या गुजराती निरमा पॉवडरने अजित पवार 'क्लिन' ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 16:33 IST

खुद्द रावसाहेब दानवे यांनीच म्हटले होते की, आमच्याकडे गुजरातचा निरमा असून नेत्यांना त्या निरम्याने धुतल्यानंतरच आम्ही सोबत घेतो. त्याच निरम्यानं अजित पवार क्लिन झाले का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. 

मुंबई - महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथ अद्याप थांबलेली नाही. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या साथीत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय भूकंप झाला होता. आता त्याच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. किंबहुना भाजपचे सत्तास्थापनेचे स्वप्न भंगले आहे. मात्र अजित पवार यांचा भाजपसोबत जाण्याचा उद्देश साध्य झाल्याचे दिसून येत आहे. 

राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापन करणार हे स्पष्ट झाल्यानंतर अजित पवार यांनी तातडीने भाजपला पाठिंबा दर्शवित उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले होते. मात्र बहुमत सिद्ध झाले नव्हते. राज्यपालांनी फडणवीसांना 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती. अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांना फोडून भाजपला बहुमत सिद्ध कऱण्यास मदत करणार अशी शक्यता होती. मात्र शरद पवारांनी घेतलेल्या भुमिकेमुळे भाजपच्या महत्त्वकांक्षेवर पाणी फेरले गेले. 

दरम्यान अजित पवार गटनेते म्हणून काही आमदार घेऊन भाजपसोबत  गेले होते. मात्र ते आमदार पवारांच्या भूमिकेनंतर परत आले होते. तरी देखील भाजपला सरकार स्थापन्याचा विश्वास होता. त्यातच अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे असलेले आरोप आणि त्याची सुरू असलेली चौकशी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, भाजपच्या आरोपांमुळेच अजित पवार यांची चौकशी सुरू होती. ते अजित पवार भाजपमध्ये जाताच चौकशी बंद झाली होती. 

चौकशी थांबल्याने अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला. मात्र भाजपमध्ये जाताच क्लिनचीट मिळते, हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले. याआधी खुद्द रावसाहेब दानवे यांनीच म्हटले होते की, आमच्याकडे गुजरातचा निरमा असून नेत्यांना त्या निरम्याने धुतल्यानंतरच आम्ही सोबत घेतो. त्याच निरम्यानं अजित पवार क्लिन झाले का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.