शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

राजीनामा देण्यापूर्वीच भाजपच्या गुजराती निरमा पॉवडरने अजित पवार 'क्लिन' ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 16:33 IST

खुद्द रावसाहेब दानवे यांनीच म्हटले होते की, आमच्याकडे गुजरातचा निरमा असून नेत्यांना त्या निरम्याने धुतल्यानंतरच आम्ही सोबत घेतो. त्याच निरम्यानं अजित पवार क्लिन झाले का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. 

मुंबई - महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथ अद्याप थांबलेली नाही. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या साथीत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय भूकंप झाला होता. आता त्याच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. किंबहुना भाजपचे सत्तास्थापनेचे स्वप्न भंगले आहे. मात्र अजित पवार यांचा भाजपसोबत जाण्याचा उद्देश साध्य झाल्याचे दिसून येत आहे. 

राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापन करणार हे स्पष्ट झाल्यानंतर अजित पवार यांनी तातडीने भाजपला पाठिंबा दर्शवित उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले होते. मात्र बहुमत सिद्ध झाले नव्हते. राज्यपालांनी फडणवीसांना 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती. अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांना फोडून भाजपला बहुमत सिद्ध कऱण्यास मदत करणार अशी शक्यता होती. मात्र शरद पवारांनी घेतलेल्या भुमिकेमुळे भाजपच्या महत्त्वकांक्षेवर पाणी फेरले गेले. 

दरम्यान अजित पवार गटनेते म्हणून काही आमदार घेऊन भाजपसोबत  गेले होते. मात्र ते आमदार पवारांच्या भूमिकेनंतर परत आले होते. तरी देखील भाजपला सरकार स्थापन्याचा विश्वास होता. त्यातच अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे असलेले आरोप आणि त्याची सुरू असलेली चौकशी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, भाजपच्या आरोपांमुळेच अजित पवार यांची चौकशी सुरू होती. ते अजित पवार भाजपमध्ये जाताच चौकशी बंद झाली होती. 

चौकशी थांबल्याने अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला. मात्र भाजपमध्ये जाताच क्लिनचीट मिळते, हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले. याआधी खुद्द रावसाहेब दानवे यांनीच म्हटले होते की, आमच्याकडे गुजरातचा निरमा असून नेत्यांना त्या निरम्याने धुतल्यानंतरच आम्ही सोबत घेतो. त्याच निरम्यानं अजित पवार क्लिन झाले का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.