शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar: "आमच्या तिघांचं सरकार असल्याने सगळ्यांना तडजोडी कराव्या लागल्या"; अजित पवारांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 19:13 IST

अजित पवार निधिवाटपात भेदभाव करायचे असा शिंदे गटाचा होता आरोप

Ajit Pawar: राज्यात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. शिवसेनेची अंतर्गत धुसफूस बाहेर आली आणि एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली. शिंदे यांच्या नेतृत्वाखील गटाने भाजपासोबत हातमिळवणी करून सत्तास्थापना केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. शिवसेनेच्या आमदारांना महाविकास आघाडीत तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अपेक्षित निधी मिळत नसल्याचा आरोप बंडखोर आमदारांनी सातत्याने केला. त्यानंतर आज, 'प्रत्येक पक्षाने तडजोडी केल्या आणि ज्यांचा पालकमंत्री त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना झुकते माप मिळाले', असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.

"आमचं सरकार हे ३ पक्षांचे सरकार होतं. त्यामुळे आम्ही सरकारमध्ये असताना तडजोडी आणि त्याग करावाच लागला. कोणीही पालकमंत्री असला तरी तो संपूर्ण जिल्ह्याचा पालकमंत्री असतो. त्यामुळे साऱ्या जिल्ह्याचा विचार केला जात होता हे खरं आहे. पण ज्या भागात ज्या पक्षाचा पालकमंत्री होता, त्या ठिकाणी त्या त्या पक्षाला झुकतं माप मिळत होतं. जिथे काँग्रेसचे पालकमंत्री होते तिथे काँग्रेसच्या लोकांचा झुकतं माप होतं. जिथे शिवसेनेचे पालकमंत्री होते, तेथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना झुकतं माप मिळत होतं. जेव्हा सरकारमध्ये विविध पक्ष असतात तेव्हा अशाप्रकारच्या तडजोडी करावेच लागतात", अशी कबुली अजित पवार यांनी दिली. 

संजय राऊत सातत्याने सत्तांतराच्या गोष्टी करत आहेत. त्यावरही अजित पवार यांनी टीका केली. "आमच्या संपर्कात कुणी आमदार नाही. त्यामुळे मी कशाला उगाच काहीतरी सांगू. आमच्या संपर्कात कुणी आमदार आल्यानंतर मी त्याबद्दल काही सांगेन. आज माझं स्वत:चं मत आहे की, आजच्या घडीला एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा सध्या राज्यात पूरपरिस्थिती गंभीर आहे तिथे मदत करण्यासाठी पुढे आलं पाहिजे. तसेच महाराष्ट्रातील जनतेला मदत करण्यासाठी पुढाकार घेऊन पुढे यावं", असं त्यांनी सुनावलं.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीEknath Shindeएकनाथ शिंदे