शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

अजित पवारांसह ६० जणांच्या चौकशीला स्थगिती; उच्च न्यायालयाने दिला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 3:26 AM

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सहा हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य ६० जणांच्या सुरू असलेल्या चौकशीला उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली.

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सहा हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य ६० जणांच्या सुरू असलेल्या चौकशीला उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. त्यामुळे अजित पवार यांच्यासह अन्य संचालकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सहा हजार कोटींच्या घोटाळ्याची चौकशी २०१४ मध्ये सुरू करण्यात आली. यामध्ये राष्टÑवादीचे अजित पवार व अन्य ६० जणांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यामुळे त्यांची चौकशी करण्यासाठी सरकारने २०१५ मध्ये विशेष अधिकाºयाची नियुक्ती केली. मात्र, महाराष्ट्र सहकार कायद्याच्या कलम ८८ नुसार, ही चौकशी दोन वर्षांमध्ये पूर्ण करणे बंधनकारक आहे. मात्र अजित पवार व इतरांची चौकशी दोन वर्षांत पूर्ण होऊ शकली नाही. चौकशीचा कालावधी वाढविण्यासाठी सरकारने २०१७ मध्ये कायद्यात सुधारणा केली. मात्र ही कायद्यातील सुधारित तरतूद पूर्वलक्षी प्रभावाने लागू होऊ शकत नाही, असे म्हणत बँकेचे माजी संचालक माधवराव पाटील यांनी सुधारित कायद्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्या. आर. एम. सावंत व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होती.‘कायद्याच्या कलम ८८ अंतर्गत चौकशीचा कालावधी दोन वर्षे इतकाच आहे. त्यामुळे कायद्यानुसार, चौकशीचा कालावधी २१ नोव्हेंबर २०१६ रोजी संपला आणि विशेष अधिकारी कोणताही निष्कर्ष काढू शकले नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने २०१७ मध्ये कायद्यात सुधारणा करून हा कालावधी वाढविला. तसेच ही तरतूद पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल, असेही या नव्या कायद्यात म्हटले आहे. सरकार सुधारित कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करू शकत नाही. त्यामुळे सुधारित कायदा रद्द करावा,’ अशी विनंती पाटील यांचे वकील जोएल कार्लोस यांनी न्यायालयाला केली.तसेच या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत चौकशीलास्थगिती द्यावी, अशी विनंतीही कार्लोस यांनी केली. उच्च न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत चौकशीला स्थगिती दिली. ‘जुन्या कायद्यानुसार चौकशीचा कालावधी वाढविला जाऊ शकत नाही. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत चौकशी करू नये,’ असे म्हणत उच्च न्यायालयाने अजित पवार यांच्यासह ६० जणांना दिलासा दिला.सुनावणी २२ नोव्हेंबरलाराज्य सरकारला याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी २२ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारHigh Courtउच्च न्यायालय