शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
4
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
5
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
6
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
7
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
8
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
9
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
10
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
11
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
12
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
13
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
15
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
16
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
17
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
18
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
19
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
20
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 

हिजाब वादावरून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 13:08 IST

अजित पवार म्हणाले की, काही लोक हिजाब वादातून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत, हे दुर्दैवी आहे. भारतीय संस्कृती आणि संविधान आपल्याला जातीय आणि धार्मिक आधारावर लोकांमध्ये फूट पाडायला शिकवत नाही. 

मुंबई : कर्नाटकातील हिजाब वादाचे पडसाद राज्यात उमटू लागले असून महाराष्ट्रातही काही ठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत. या पार्श्वभूमीवर समाजात आणखी फूट पडेल अशा घटना टाळायला हव्यात, असे आवाहन करतानाच काही लोक या प्रकरणात राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.

अजित पवार म्हणाले की, काही लोक हिजाब वादातून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत, हे दुर्दैवी आहे. भारतीय संस्कृती आणि संविधान आपल्याला जातीय आणि धार्मिक आधारावर लोकांमध्ये फूट पाडायला शिकवत नाही. 

आज जग पुढे जात आहे. प्रगत देश आणखी प्रगत होत आहेत. आपल्या देशात तरुणांची एवढी मोठी फळी असताना तरुणाईचा वापर विकासासाठी कसा करता येईल याचा विचार करायला हवा. कोणी तरी एखादा व्हिडीओ व्हायरल करतो, त्यावरून दुसरा ट्विट करतो. काऊंटर ट्विट सुरू होतात आणि निष्कारण विषयाला महत्त्व दिले जाते. याबाबत सर्वांनी समंजस भूमिका घेऊन संयम ठेवला पाहिजे, असे आवाहन पवार यांनी केले.

महाराष्ट्रात अशांतता नको - गृहमंत्री वळसे-पाटील- राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही कर्नाटकातील वादातून महाराष्ट्रात आंदोलन करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. - शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थेत असे वाद आणू नयेत. शैक्षणिक संस्थाचे जे नियम असतील ते सर्वांनी पाळले पाहिजेत. - दुसऱ्या राज्यातील एखाद्या घटनेवरुन महाराष्ट्रात आंदोलन करुन समाजात अशांतता निर्माण करणे राज्याच्या हिताचे नाही. - राजकीय फायद्यासाठी अशा प्रकारचे आंदोलन करणे योग्य नाही. सर्वांनी शांतता ठेवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारHinduहिंदूMuslimमुस्लीम