मुंबई : राज्याच्या कृषी क्षेत्राला डिजिटल युगात अग्रेसर ठेवणाऱ्या ‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय धोरण २०२५-२०२९’ अर्थात महाॲग्री-एआय या धोरणास मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे बांधावर शेतकऱ्यांसोबत राबण्यासाठी आता एआय गडी सज्ज होत आहे. कीड व्यवस्थापनासह, वादळ-पावसाचे सोप्या भाषेतून इशारे, माल कुठे विकावा, खत आणि पाण्याच्या वापराबाबत सूचना देऊन हा गडी खर्चात कपात करून नफ्यात वाढ करण्याच्या दृष्टीने मोलाचे सल्ले देणार आहे. त्याच्या अचूक सल्ल्यामुळे नुकसान कमी होईल, उत्पन्न वाढेल आणि उत्पादन खर्च कमी होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.
वापर: एआय चॅटबॉट्स व व्हॉइस असिस्टंट्समुळे शेतकऱ्यांना मराठीतून वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल.फायदा: सोप्या भाषेतील माहितीमुळे चुकीचे निर्णय टळतील, उत्पादनात सुधारणा होईल.
वापर: पिकांची निवड, हवामान अंदाज, कीड-रोग नियंत्रण, बाजारभाव याबाबत अचूक सल्ला वेळेवर मिळेल.फायदा: वेळीच आणि अचूक सल्ला मिळाल्यामुळे नुकसान टळेल. बाजारभाव लक्षात येईल. नफा वाढेल.
वापर: शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी सिम्युलेशन टूल्स विकसित केली जातील.फायदा: पेरणीपूर्वीच संभाव्य जोखीम, खर्च, उत्पादनाचा अंदाज व पर्यायी पद्धती समजतील.
वापर: शेतापासून ग्राहकापर्यंतच्या प्रवासात पिकांना दिलेली खते व औषधे, शेती पद्धती, प्रक्रिया व गुणवत्ता प्रमाणपत्र इत्यादी बाबींचे डिजिटल आणि जिओ-टॅग केलेली नोंदवही याद्वारे तयार होईल.फायदा: खरेदी करणाऱ्याच्या मोबाइलवरच तुमच्या पिकाचा इतिहास दिसेल आणि दरही चांगला मिळेल.