शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
4
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
5
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
6
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
7
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
8
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
9
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
10
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
11
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
12
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
13
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
14
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
15
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
16
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
17
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
18
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
19
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
20
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...

महाराष्ट्रात साडेतीन हजार वर्षांपूर्वी केली जात होती शेती, मिळाले पुरावे; कोल्हापूरच्या संशोधकांचे संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 18:54 IST

उत्खननात आढळली शेती अवजारे

संदीप आडनाईककोल्हापूर : गोंदिया जिल्ह्यात लोहयुगकालीन कृषी अर्थव्यवस्थेवर प्रकाश टाकणारा प्रबंध ऑक्टोबर महिन्याच्या करंट सायन्स या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. यामुळे सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वीही महाराष्ट्रात शेती होत असल्याच्या पुराव्याला भक्कम आधार मिळाला आहे. मूळचे कोल्हापूरचे, पण सध्या डेक्कन कॉलेजमध्ये प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्वशास्त्र विभागात पुरावनस्पती शास्त्राचे संशोधक असलेल्या डॉ. सतीश नाईक यांनी नागपूरच्या पुरातत्त्व विभागाचे डॉ. विराग सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन केले आहे.गोंदिया जिल्ह्यात तिरोडा तालुक्यातील मल्ली येथील पुरातत्त्वीय स्थळाचे उत्खनन २०१०-११ आणि २०१२-१३ मध्ये केले होते. हे स्थळ नागपूरपासून १३५ किलोमीटर पूर्वेस चोरखंबारा या वैनगंगेच्या उपनदीच्या डाव्या तीरावर आहे. यात आद्य लोहयुगकालीन संस्कृतीचे अवशेष आढळले. याची पुष्टी वैज्ञानिक रेडिओ कार्बन डेटिंग पद्धतीने केली आहे. डॉ. नाईक यांनी मल्लीच्या उत्खननात ७९ मातीचे नमुने घेऊन जळालेल्या धान्याचे तरंगतंत्रज्ञानाद्वारे, प्रयोगशाळेत विलगीकरण करून संशोधन केले. यातून ४१७४ वनस्पतींचे अवशेष मिळाले.यात तांदूळ, वेगवेगळ्या तृणधान्य, कडधान्य, जंगली फळेवर्गीय वनस्पतींचे अवशेष आणि भात शेतीमधील तणांचे अवशेष आढळले. यात तांदळाचे प्रमाण ४८ टक्के होते. तृणधान्यांत कोडोमिलेट, सावा मिलेट, ब्राऊनटॉप मिलेट, फॉक्सटेल मिलेटस्चा समावेश होता. कडधान्यांत उडीद, मूग, कुळीथ, पावटा, लाख इत्यादी द्विदल वनस्पतींचे बी व तेलबियांत मोहरी आढळली. भात पिकाच्या तणांपैकी लव्हाळेवर्गीय वनस्पती, रिंकल ग्रास सापडले. जंगली फळांच्या बियांपैकी बोरं, वांगी मिळाली आहे. काळी मुसळी, डेफ्लावर, निळी या औषधी वनस्पतींचे अवशेषही आढळले.

उत्खननात आढळली शेती अवजारे

या प्राचीन स्थळाचा कालावधी ३४०० वर्षांपूर्वीचा असल्याचे स्पष्ट होते. येथे आद्य लोहयुगकालीन संस्कृतीची वसाहत आणि ४०० मेगालिथस कालावधीतील मानवी दफनभूमीचे अवशेष आहेत. यात मृदभांडी, शेतीची अवजारे, विळा, कुऱ्हाडी, सुरी, अशा लोखंडाच्या वस्तूही आढळल्या आहेत.

आद्य लोहयुगापासून औषधी वनस्पतींचा वापर भारत करीत आला आहे. निळीचा उपयोग मृद भांड्यावर रंगकाम, नक्षीकामासाठी केला असावा. आयुर्वेदात आजारावरही नीळ वापरल्याचे संदर्भ आहेत. विदर्भात तांदूळ हा ताम्रपाषाण काळापासून पिकवला जातो. मल्ली हे ठिकाण अतिपावसाच्या प्रदेशात असल्यामुळे येथे तांदूळ पिकवण्यासाठी अनुकूल, पोषक हवामान मिळाले. -डॉ. सतीश नाईक, पुरावनस्पती शास्त्रज्ञ, डेक्कन कॉलेज, पुणे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरResearchसंशोधन