शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

Maharashtra Politics: “जमिनीवर गाऱ्यात फिरणं वेगळं अन् चॉकलेट खाणं, कम्प्युटरवर बसणं वेगळं”; आदित्य ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 09:19 IST

Maharashtra News: ज्यांना स्वतःचा बाण सुरक्षित ठेवला नाही, ते बांध कसा सुरक्षित ठेवू शकतात, या शब्दांत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे.

Maharashtra Politics: परतीच्या पावसामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नसल्यावरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी आणि दिलासा द्यावा, या मागणीसाठी विरोधक आग्रही तसेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. यावरुन बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना रोखठोक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. 

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर लगेचच आदित्य ठाकरे यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांची विचारपूस केली. यावेळी माध्यमांशी बोलताना, कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी कुठे गेले कृषिमंत्री असा प्रश्न विचारला होता. याला कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी बोचरी टीका करत पलटवार केला आहे.  

जमिनीवर गाऱ्यात फिरणे वेगळे अन् चॉकलेट खाणे वेगळे

ज्याला बाण समजते त्याला बांध समजले. त्यांनी स्वतःचा बाण सुरक्षित ठेवला नाही. बांध कसा ठेवू शकतात, असा प्रतिप्रश्न करत, मला वाटते, घरात चॉकलेट खाणे वेगळे, काम्प्युटरवर बसणे वेगळे आणि जमिनीवर या गाऱ्यात फिरणे वेगळे आहे. आमच्याकडे उद्धव ठाकरे हे औरंगाबादला आले. त्यांचे अडीच तासांचे नियोजन होते. त्यात २४ मिनिटे पाहणी केली. काय २४ मिनिटांत महाराष्ट्राची पाहणी करू शकतात. म्हणून त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारावे बाण कोणते आहे. काम कोणते आहे आणि बांध कुठे आहे, असा खोचक टोला अब्दुल सत्तार यांनी लगावला. 

दरम्यान, समृद्धीच काम व्यवस्थित नाही झालेले, मजा मस्ती मध्ये सगळे चालले आहे, शेतकरी बांधवांचा धीर सुटत चालला आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे, शेतकरी बांधव संकटात कायम उभा असतो आपल्याला त्यांच्यासाठी उभे राहावे लागेल. खाते वाटप होणार, बंगले वाटप होणार पण समस्या सुटणार आहे का, अशी विचारणा करत, बांधावर आल्यावर कळत शेतकऱ्यांचे दुःख काय आहे, असे सांगत आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकावर घणाघाती टीका केली होती.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारAaditya Thackerayआदित्य ठाकरे