शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

Abdul Sattar : "दुश्मन को भी जिंदा रखने की दुवा करनेवाला मुख्यमंत्री"; अब्दुल सत्तारांनी केलं भरभरून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 10:43 IST

Abdul Sattar : शेतकरी समस्यांच्या मुळापर्यंत जाणेसाठी राज्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" हा उपक्रम राज्यभर राबविण्याची संकल्पना मांडलेली आहे.

सुलभ आणि प्रभावी कृषि विषयक धोरण तयार करण्यासाठी  शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व प्रश्न प्रशासनाने समजून घेणे, त्यावर कोणत्या उपाययोजना करून धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत व्यतीत करून शेतकरी समस्यांच्या मुळापर्यंत जाणेसाठी राज्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" हा उपक्रम राज्यभर राबविण्याची संकल्पना मांडलेली आहे. याच दरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक केलं आहे. 

"दुश्मन को भी जिंदा रखने की दुवा करनेवाला मुख्यमंत्री" असं म्हटलं आहे. तसेच भविष्यात शेतकरी आत्महत्या करणार नाही यावर उपाययोजना निश्चित केल्या जातील असंही सांगितलं. "ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल त्यापैकी एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही. तंतोतंत पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. 90 टक्के भागाचे पंचनामे झाले असून 10 टक्के भागात पाणी साचलं असल्याने ते राहिलं आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांनी डबल नुकसान भरपाई देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला घेतला."

"एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही" 

"सरकारकडून सर्वांना मदत मिळेल. पहिलांदा गतिमान सरकार आलं आहे. विरोधकांचं काम विरोध करणं हेच आहे. पण आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे "दुश्मन को भी जिंदा रखने की दुवा करनेवाला मुख्यमंत्री" आहेत. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेणार, निराश झालेल्या शेतकऱ्यांना परत उभं करण्यासाठी त्याला सक्षम करण्यासाठी काम करणार. भविष्यात शेतकरी आत्महत्या करणार नाही यावर उपाययोजना निश्चित केल्या जातील" असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

"भविष्यात शेतकरी आत्महत्या करणार नाही"

या उपक्रमाची राज्यस्तरीय सुरुवात 1 सप्टेंबर, 2022 रोजी स्वत: कृषि मंत्री महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम अशा मेळघाटातून करणार आहेत. धारणी चिखलदरा या अत्यंत दुर्गम ,डोंगराळ, कोरडवाहू व आदिवासी बहुल तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत ते संपूर्ण दिवसभर असणार आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी,समस्या, त्यातून निर्माण होणारे नैराश्य व त्यातून उद्भवणाऱ्या शेतकरी आत्महत्या यासंदर्भात योजना तयार करणारे व ती राबविणारे शासनाचे वेगवेगळे विभाग यांना याबाबतची कारणमीमांसा करून आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे या अनुषगाने हा उपक्रम सुरू केलेला आहे.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारEknath Shindeएकनाथ शिंदेFarmerशेतकरी