शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Abdul Sattar : "दुश्मन को भी जिंदा रखने की दुवा करनेवाला मुख्यमंत्री"; अब्दुल सत्तारांनी केलं भरभरून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 10:43 IST

Abdul Sattar : शेतकरी समस्यांच्या मुळापर्यंत जाणेसाठी राज्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" हा उपक्रम राज्यभर राबविण्याची संकल्पना मांडलेली आहे.

सुलभ आणि प्रभावी कृषि विषयक धोरण तयार करण्यासाठी  शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व प्रश्न प्रशासनाने समजून घेणे, त्यावर कोणत्या उपाययोजना करून धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत व्यतीत करून शेतकरी समस्यांच्या मुळापर्यंत जाणेसाठी राज्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" हा उपक्रम राज्यभर राबविण्याची संकल्पना मांडलेली आहे. याच दरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक केलं आहे. 

"दुश्मन को भी जिंदा रखने की दुवा करनेवाला मुख्यमंत्री" असं म्हटलं आहे. तसेच भविष्यात शेतकरी आत्महत्या करणार नाही यावर उपाययोजना निश्चित केल्या जातील असंही सांगितलं. "ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल त्यापैकी एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही. तंतोतंत पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. 90 टक्के भागाचे पंचनामे झाले असून 10 टक्के भागात पाणी साचलं असल्याने ते राहिलं आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांनी डबल नुकसान भरपाई देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला घेतला."

"एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही" 

"सरकारकडून सर्वांना मदत मिळेल. पहिलांदा गतिमान सरकार आलं आहे. विरोधकांचं काम विरोध करणं हेच आहे. पण आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे "दुश्मन को भी जिंदा रखने की दुवा करनेवाला मुख्यमंत्री" आहेत. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेणार, निराश झालेल्या शेतकऱ्यांना परत उभं करण्यासाठी त्याला सक्षम करण्यासाठी काम करणार. भविष्यात शेतकरी आत्महत्या करणार नाही यावर उपाययोजना निश्चित केल्या जातील" असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

"भविष्यात शेतकरी आत्महत्या करणार नाही"

या उपक्रमाची राज्यस्तरीय सुरुवात 1 सप्टेंबर, 2022 रोजी स्वत: कृषि मंत्री महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम अशा मेळघाटातून करणार आहेत. धारणी चिखलदरा या अत्यंत दुर्गम ,डोंगराळ, कोरडवाहू व आदिवासी बहुल तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत ते संपूर्ण दिवसभर असणार आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी,समस्या, त्यातून निर्माण होणारे नैराश्य व त्यातून उद्भवणाऱ्या शेतकरी आत्महत्या यासंदर्भात योजना तयार करणारे व ती राबविणारे शासनाचे वेगवेगळे विभाग यांना याबाबतची कारणमीमांसा करून आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे या अनुषगाने हा उपक्रम सुरू केलेला आहे.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारEknath Shindeएकनाथ शिंदेFarmerशेतकरी