शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाची अनास्था शेतकऱ्यांच्या मुळावर; दर्जेदार बियाणे मिळाले नाही, कॅगचा धक्कादायक निष्कर्ष

By अतुल कुलकर्णी | Updated: July 3, 2019 00:46 IST

राज्यात कृषी क्षेत्राचे उत्पादन वाढल्याचा दावा राज्य सरकारने केला असला तरी कॅगच्या अहवालाने कृषी विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत.

मुंबई : शेतकऱ्यांना बियाणांची जेवढी गरज होती त्यापेक्षा कमी बियाणे पुरवली गेली. बियाणांच्या उत्पादनाची साखळी अत्यंत वाईटरीत्या विस्कळीत झाली होती. सोयाबीनच्या बाबतीत हे प्रमाण अधिक गंभीर होते. त्यामुळे शेतक-यांना दर्जेदार बियाणे मिळू शकली नाहीत, असे धक्कादायक निष्कर्ष कॅगने (भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक) काढले आहेत.राज्यात कृषी क्षेत्राचे उत्पादन वाढल्याचा दावा राज्य सरकारने केला असला तरी कॅगच्या अहवालाने कृषी विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. २0१४-१५ ते २0१६-१७ या कालावधीत पुरवठा करण्यात आलेले एकूण बियाणे आवश्यकतेपेक्षा कमी होते. शासनाने प्रमाणित केलेल्या बियाणांची गुणवत्ता ८0 टक्के असताना ती २२.१८ टक्के एवढीच निघाली. शासनातर्फे पुरवण्यात आलेल्या बियाणांचा फायदा शेतकºयांना झाला नाही. परिणामी शेतकºयांना बियाणांसाठी खाजगी कंपन्या व खाजगी उत्पादकांवर अवलंबून राहावे लागले, असेही कॅगने म्हटले आहे.राज्यातील शेतकºयांना सोयाबीनच्या पिकासाठी कमी प्रतीच्या प्रमाणित बियाणांचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर कमी झाले. प्रात्यक्षिक कार्यक्रमात देखील कृषी विभागाने बियाणांच्या नवीन प्रकाराऐवजी जुन्याच प्रकारच्या बियाणांचा वापर केल्यामुळे मूळ हेतूलाच हरताळ फासला गेला. बियाणांचे चाचणी परिणाम जाहीर करण्यास प्रयोगशाळांना विलंब झाल्यामुळे शेतकºयांना निकृष्ट दर्जाच्या बियाणांचे वाटप झाले, असेही कॅगने म्हटले आहे.नियोजनाचा अभावत्याशिवाय कंपन्यांना पुनर्नोंदणीची परवानगी दिल्यामुळे सरकारच्या तिजोरीवर ३५.७४ कोटीचा भार पडला, कृषी अवजाराची खुल्या बाजारातील दरापेक्षा जास्त दराने खरेदी केली गेली. बियाणांच्या चाचणी प्रयोगशाळेत पायाभूत सुविधांच्या नियोजनाचा अभाव होता. विविध राष्ट्रीय पुरस्कृत योजनांसाठी केंद्र सरकारचा वाटा प्राप्त झाल्यानंतरही राज्य शासनाकडून निधी मिळण्यास विलंब झाला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांद्वारे सर्व राष्ट्रीय पुरस्कृत योजनेसाठी उघडण्यात आलेले बचत बँक खाते अधिकृत नसल्याने ते बंद करण्याचे निर्देश द्यावे लागले. त्यामुळे २६९.९८ कोटी अखर्चित शिल्लक शासनजमा करावी लागली. त्यामुळे शेतकºयांना याचा कुठलाही लाभ झाला नाही. अशी अनेक गंभीर निरीक्षणे कॅगने नोंदविली आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी