शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

शेतकऱ्यांसाठी कृषी अनुदान आवश्यकच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 06:19 IST

‘आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी’ अशीच धोरणे राहिली असल्याने शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस अधिक क्लिष्ट होत चालले आहेत.

- विजय जावंधिया‘आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी’ अशीच धोरणे राहिली असल्याने शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस अधिक क्लिष्ट होत चालले आहेत. त्यातूनच सातत्याने कर्जमाफीची मागणी पुढे येत राहते. कर्ज फेडण्याची ताकदच तयार करणारे धोरण नसल्याने वारंवार कर्जमाफीचे गाजर दाखविले जाते, यात शेतकºयाला आनंद नाही. शेतकºयाला कर्ज फेडण्याइतपत सक्षम करण्याची आजची गरज आहे. ते होत नसल्याने अनुदानाचा पर्याय पुढे आला आहे. अनुदानाशिवाय शेती जगूच शकत नाही, अशी आजची परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याला सर्वस्वी केंद्र व राज्य सरकारची धोरणे कारणीभूत ठरली आहेत. तेलंगण सरकार जर प्रतिशेतकरी १० हजारांचे अनुदान सरसकट दरवर्षी देत असेल तर देशाची आर्थिक राजधानी आाणि प्रगत म्हणून मिरविणाºया महाराष्ट्राला ते का शक्य होत नाही.महाराष्ट्र सरकारने केंद्राच्या धोरणांचा अभ्यास करून आपले स्वतंत्र शेती धोरण ठरविणे आवश्यक आहे; पण ते होताना दिसत नाही. आजही राज्यातील ७० टक्के शेती कोरडवाहू आहे. या शेतीचे प्रश्न पूर्णपणे वेगळे आहेत. निव्वळ सिंचनाच्या सुविधा पुरविल्या की प्रश्न सुटले असे होत नाही. शेतीला निसर्ग आणि बाजार असा दुहेरी फटका बसतो. बागायती शेतीला अनुदान मोठ्या प्रमाणावर दिले जाते; पण कोरडवाहूला मात्र त्यातून वगळले जाते. पीक विम्याचाच विचार केला तर त्याचे निकष बागायती व कोरडवाहूसाठी एकच ठेवले जातात, हे चुकीचे आहे. ते वेगळेच असायला हवेत; शिवाय ‘मंडळ’ऐवजी ‘गाव’ हाच निकष ग्राह्य धरला पाहिजे; पण तसे होताना दिसत नाही. ऊस उत्पादकांना आयात, निर्यात, बफर स्टॉक, हमीभाव अशा स्वरूपातून सरकारी अनुदान दिले जाते; पण कोरडवाहू पिकांना ते दिले जात नाही. शेतकरी आत्महत्येसारख्या फेºयातून बाहेर काढण्यासाठी मशागत व औषधपाण्याचा खर्च म्हणून ठराविक रक्कम दरवर्षी देणे गरजेचे आहे.झिरो बजेट हे कृषितंत्र तर धांदात खोटे आहे. हे तंत्र सांगणाऱ्यांच्या गावातच याचा अवलंब होत नाही. झिरो बजेटच्या नावाखाली अन्नदात्या शेतकºयांना मूर्ख बनविले जात आहे आणि याला केंद्र सरकार भुलते हे त्यापेक्षा दुर्दैवी आहे. शेतजमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्हींची सांगड घालावीच लागणार आहे. हरितक्रांतीवेळी स्वामीनाथन यांनी निव्वळ रासायनिक खतांचाच वापर करा, असे कधी म्हटले नव्हते. शेणखताचा वापर करण्यासाठी त्याची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. शेणखत तयार करण्यासाठी जनावरांना अनुदान देण्याऐवजी रासायनिक खतांना अनुदान देण्याचे सरकारचे धोरण आहे. यामुळे जनावरे वाढत नाही, ती न वाढल्याने शेणखत मिळत नाही. ते न मिळाल्याने जमीन सुपीक होत नाही. हे असेच दुष्टचक्र सर्वच शेतीधोरणात चालू आहे. एका ज्वारीसाठी अनुदान दिले तर शेतकरी ज्वारी पेरेल, त्यातून धान्याची गरज भागेल, चारानिर्मिती होईल, जनावरे पोसली जातील, शेणखतही उपलब्ध होईल, या खताने जमिनीचा पोत वाढेल, पाणी धारणक्षमता वाढेल.(लेखक शेतकरी नेते आहेत.)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी