शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

नाशिकमध्ये व्यापा-यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार- कृषी उत्पन्न बाजार समिती

By admin | Updated: July 11, 2016 17:36 IST

लिलावात सहभागी होण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद न देणार्‍या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लासलगाव व इतर उपआवारावरील 450 व्यापा-यांना अनुज्ञप्ती परवाने निलंबित

ऑनलाइन लोकमत

लासलगाव (नाशिक), दि. 11 - शासनाच्या अध्यादेशाला विरोध करणा-या व्यापा-यांनी सोमवार (दि. 11) पासून लिलावात सहभागी होण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद न देणार्‍या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लासलगाव व इतर उपआवारावरील 450 व्यापा-यांना अनुज्ञप्ती परवाने निलंबित करण्याबाबत तसेच बाजार समितीचे व्यापारी गाळे व व्यवसायाकरिता दिलेले प्लॉट्स परत घेण्याकरिता कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात येणार आहेत, अशी माहिती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत होळकर, उपसभापती सुभाषराव कराड आणि सचिव बी. वाय. होळकर यांनी दिली.नासिकचे जिल्हा उपनिबंधक निळकंठ कर्हे  यांनी शेतकरी हिता करीता शेतीमाल सुरू करण्याकरता जे व्यापारी अडथळा निर्माण करतील अशा व्यापारी वर्गाच्या परवाने निलंबित करण्याची कारवाई करावी .तसेच शेतमाल खरेदी-विक्रीसाठी अडथळा निर्माण करतील अशा व्यापारी वर्गाचे गाळे तसेच व्यवसाय करण्याकरता दिलेले प्लॉट्स  त्वरीत परत घेण्याकरता कार्यवाही करून त्याचा अनुपालन अहवाल सोमवार सायंकाळ पर्यंत सादर करण्याचे आदेश नासिक जिल्हयातील सर्व बाजार समितीच्या कार्यालयाला  दिले आहेत.त्यानुसार ही कार्यवाही करण्याची लगबग बाजार समितीचे कार्यालयात सुरू होती.लासलगाव येथील मुख्य आवार तसेच निफाड ,विंचूर , उगाव , खानगाव , नैताळे येथील उपआवारावरील 450 व्यापार्यांना  कारणे दाखवा नोटीस दिल्या आहेत.शनिवारी  सोमवारी शेतकरी हिता करीता सोमवार पासून लिलावात सहभागी व्हावे तसेच    लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची बैठक होउन शेतकरी हितासाठी लिलावाच्या अन्य पर्यायांचा विचार करण्यात येईल असे  लासलगाव  बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर व उपसभापती सुभाष कराड  यांनी सांगितले होते. तरीही    सोमवारी व्यापारी सहभागी न झाल्याने लासलगाव येथील व उपआवारावरील शेतीमाल लिलाव बंद राहीले.शासनाच्या नियमन मुक्तीच्या अध्यादेशात फळे व भाजीपाल्याचे नियमन रद्दकरण्याबरोबरच अडत शेतक-यांऐवजी खरेदीदारांकडुन घेणेबाबत शासनाने जो निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व व्यापारी कामकाज करणेस असमर्थ असल्याच्या कारणावरूनदि. 09 पासुन सर्व व्यापारी लिलावात सहभागी होणार नसल्याचे असोशिएशनने बाजार समितीस कळविले आहे. त्यामुळे लिलाव सुरू होणेबाबत संचालक मंडळाने प्रयत्न सुरू केलेशनीवारी संपन्न झालेल्या  बैठकीस बाजार समितीचे सदस्य राजेंद्र डोखळे, पंढरीनाथ थोरे, भास्करराव   पानगव्हाणे, मोतीराम मोगल, बाळासाहेब क्षिरसागर, अशोकराव  गवळी, वैकुंठराव  पाटील, संदीप दरेकर,सचिन ब्रम्हेचा, रमेश पालवे, सचिव बी. वाय. होळकर यांचेसह अनिल सोनवणे उपस्थित होतेव्यापारी यांचे  कडून  प्रतिसाद न मिळाल्याने शासनाने पर्यायी विक्री व्यवस्थेसाठी स्थापन केलेले नोंदणीकृत थेट पणन परवानाधारक, शेतकरी समुह, शेतकरी सहकारी संस्था, ग्राहक सहकारी संस्था, महिला बचत गट,सेवा सहकारी संस्था, शेतकरी कंपनी, शेतकरी गट, खाजगी उद्योग, नोंदणीकृत कंपन्या, व्यक्तीआणि भागीदारी संस्था, नाफेड व मार्केटींग फेडरेशन यांचेमार्फत खरेदी-विक्री सुरू करणेसाठी शासनाकडे पाठपुरावा केला आहे असे हमे.. तसेच शेतमाल खरेदी-विक्रीसाठी इच्छुक असलेल्या अन्यव्यापा-यांना बाजार समितीमार्फत सुविधा पुरविण्याचा विचार करण्यात यावा अशा विविध पर्यायांवर यावेळी चर्चा करण्यात आली.सदर लिलाव बंद ने कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहे