शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

कृषी दूत येणार शेतकर्‍यांच्या मदतीला

By admin | Updated: June 17, 2014 20:31 IST

एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा करणार प्रसार

अकोला : पिकावर येणार्‍या वेगवेगळ्या किडींमुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान होत असते. या किडींचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या कीटकनाशकांची फवारणी करतो; परंतु त्याचे उलटे परिणाम होतात. म्हणूनच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विदर्भातील सहा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात शेतकर्‍यांना एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीची माहिती देण्यासाठी कृषी दूत योजना सुरू केली आहे. या योजनेला रतन टाटा ट्रस्टने अर्थसहाय्य केले आहे.विदर्भातील अकोला,बुलडाणा,वाशिम, यवतमाळ, अमरावती व वर्धा या सहा शेतकरीआत्महत्याग्रस्त जिल्ह्याचा या प्रकल्पांतर्गत समावेश करण्यात आला असून, या जिल्ह्यातील कपाशी, तूर व सोयाबीन पिकाच्या एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा जास्तीत जास्त प्रचार करू न तळागाळातील शेतकर्‍यांचा सामाजिक व आर्थिक स्थरउचावणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी नवोन्मुख विस्तार शिक्षण पद्धतीद्वारे कृषी दूतांना उत्तमरित्या प्रशिक्षण देऊन पुरेशे विषय ज्ञान अवगत करू न देण्यात येत आहे. या कृषी विद्यापीठाने आतापर्यंत १०० कृषी दूतांना प्रशिक्षण देऊन तयार केले आहे. या कृषी दूतांना एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा प्रसार करण्यासोबतच शेतकर्‍यांमध्ये क्षमता विकसित करणे, एकरी लागवड खर्च कमी करणे, कमीत कमी कृषी निविष्ठामध्ये प्रती एकर उत्पादन वाढविणे इत्यादी बाबींवर भर द्यावा लागणार आहे. या शिवाय जमीन आरोग्य व्यवस्थापन,शाश्वत शेतीकरिता पीक अवशेषाचे नियोजन, पीक फेरपालट, त्याचे फायदेव उपयुक्तता,पेरणी करताना किंवा पेरणीपूर्वी पीक संरक्षणविषयक दक्षता, रोग नियंत्रणासाठी बीजप्रक्रियेचे महत्त्व, कपाशी, तूर व सोयाबीन पिकावर येणारे रोग, क ीड व व्यवस्थापन, सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण, कीड सर्वेक्षणाच्या विविध पद्धती, किटकांचे प्रकार व त्यानुसार निर्माण होणारी नुकसानीची पातळी, कीड व्यवस्थापनातील नवीन आव्हाने व किटकनाशके फवारणीतंत्रज्ञान इत्यादी उपाययोजनेबाबत या कृषी दूतांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

** या प्रकल्पांतर्गत लाखो शेतकर्‍यांपर्यंत कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्याचे काम कृषी दूत करीत आहेत. कृषी दूतांना मार्गदर्शन करण्यासाठी क्षेत्र अधिकारी नेमण्यात आले आहेत.

** खरीप व रब्बी हंगाम सुरू होण्याअगोदर कृषी दूतांना कृषी विद्यापीठाच्या मुख्यालयी प्रशिक्षण देण्यात येते. हे कृषी दूत शेतीतंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहेत.शेतकरी उत्तम कृषी व्यवस्थापक व्हावा,त्यांच्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे या प्रकल्पाच्या माध्यमातून अपेक्षित आहे.  - डॉ. विजय माहोरकर,संचालक, विस्तार शिक्षण, डॉ.पंदेकृवि,अकोला.