शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी दूत येणार शेतकर्‍यांच्या मदतीला

By admin | Updated: June 17, 2014 20:31 IST

एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा करणार प्रसार

अकोला : पिकावर येणार्‍या वेगवेगळ्या किडींमुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान होत असते. या किडींचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या कीटकनाशकांची फवारणी करतो; परंतु त्याचे उलटे परिणाम होतात. म्हणूनच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विदर्भातील सहा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात शेतकर्‍यांना एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीची माहिती देण्यासाठी कृषी दूत योजना सुरू केली आहे. या योजनेला रतन टाटा ट्रस्टने अर्थसहाय्य केले आहे.विदर्भातील अकोला,बुलडाणा,वाशिम, यवतमाळ, अमरावती व वर्धा या सहा शेतकरीआत्महत्याग्रस्त जिल्ह्याचा या प्रकल्पांतर्गत समावेश करण्यात आला असून, या जिल्ह्यातील कपाशी, तूर व सोयाबीन पिकाच्या एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा जास्तीत जास्त प्रचार करू न तळागाळातील शेतकर्‍यांचा सामाजिक व आर्थिक स्थरउचावणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी नवोन्मुख विस्तार शिक्षण पद्धतीद्वारे कृषी दूतांना उत्तमरित्या प्रशिक्षण देऊन पुरेशे विषय ज्ञान अवगत करू न देण्यात येत आहे. या कृषी विद्यापीठाने आतापर्यंत १०० कृषी दूतांना प्रशिक्षण देऊन तयार केले आहे. या कृषी दूतांना एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा प्रसार करण्यासोबतच शेतकर्‍यांमध्ये क्षमता विकसित करणे, एकरी लागवड खर्च कमी करणे, कमीत कमी कृषी निविष्ठामध्ये प्रती एकर उत्पादन वाढविणे इत्यादी बाबींवर भर द्यावा लागणार आहे. या शिवाय जमीन आरोग्य व्यवस्थापन,शाश्वत शेतीकरिता पीक अवशेषाचे नियोजन, पीक फेरपालट, त्याचे फायदेव उपयुक्तता,पेरणी करताना किंवा पेरणीपूर्वी पीक संरक्षणविषयक दक्षता, रोग नियंत्रणासाठी बीजप्रक्रियेचे महत्त्व, कपाशी, तूर व सोयाबीन पिकावर येणारे रोग, क ीड व व्यवस्थापन, सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण, कीड सर्वेक्षणाच्या विविध पद्धती, किटकांचे प्रकार व त्यानुसार निर्माण होणारी नुकसानीची पातळी, कीड व्यवस्थापनातील नवीन आव्हाने व किटकनाशके फवारणीतंत्रज्ञान इत्यादी उपाययोजनेबाबत या कृषी दूतांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

** या प्रकल्पांतर्गत लाखो शेतकर्‍यांपर्यंत कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्याचे काम कृषी दूत करीत आहेत. कृषी दूतांना मार्गदर्शन करण्यासाठी क्षेत्र अधिकारी नेमण्यात आले आहेत.

** खरीप व रब्बी हंगाम सुरू होण्याअगोदर कृषी दूतांना कृषी विद्यापीठाच्या मुख्यालयी प्रशिक्षण देण्यात येते. हे कृषी दूत शेतीतंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहेत.शेतकरी उत्तम कृषी व्यवस्थापक व्हावा,त्यांच्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे या प्रकल्पाच्या माध्यमातून अपेक्षित आहे.  - डॉ. विजय माहोरकर,संचालक, विस्तार शिक्षण, डॉ.पंदेकृवि,अकोला.