शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

आरक्षणासाठी धनगर समाजाचा आक्रमक पवित्रा; "सरकारनं शब्द पाळला नाही, उद्यापासून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 13:34 IST

आज ५० दिवस संपले तरी सरकारने आरक्षणाच्या निर्णयाबाबत एकही पाऊल टाकले नाही असा आरोप धनगर समाजाने केला.

अहमदनगर – राज्यात एकीकडे मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक होतोय तर दुसरीकडे धनगर समाजानेही सरकारला इशारा दिला आहे. १६ तारखेपासून धनगर समाजातील कार्यकर्ते आमरण उपोषण करणार आहेत. यशवंत सेनेने चौंडी इथं २१ दिवसांचे उपोषण केले होते त्यावेळी सरकारने धनगर समाजाला लिखित आश्वासन दिले, परंतु दिलेला शब्द पाळला नाही असा आरोप करत यशवंत सेनेने आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली आहे.

यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले म्हणाले की, ५० दिवसांत धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय घेऊ असं सरकारने म्हटलं. त्यामुळे सरकारच्या शब्दावर विश्वास ठेवत धनगर समाजाचा गेल्या ७५ वर्षांचा वनवास दूर होईल. दिवाळी गोड होईल अशी आशा होती. परंतु या राज्य सरकराने धनगर बांधवांची क्रूर थट्टा केली आहे. आज ५० दिवस संपले तरी सरकारने आरक्षणाच्या निर्णयाबाबत एकही पाऊल टाकले नाही. त्यामुळे उद्यापासून पुन्हा आम्ही आमरण उपोषणाला बसत आहोत असं त्यांनी सांगितले.

तसेच चौंडीत आमरण उपोषणाला सुरुवात होईल पण त्याचे प्रतिबिंब राज्यातील प्रत्येक गावात, तालुक्यात, जिल्ह्यात उमटलेले दिसेल. १५-२० ठिकाणी साखळी उपोषण सुरू होईल. धनगर बांधव पुढाऱ्यांना घरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात येईल. धनगर हा ओबीसीतील सर्वात मोठा घटक आहे. परंतु कुठल्याच ओबीसी नेत्याने धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला नाही. स्पष्ट भूमिका मांडली नाही. १७ तारखेला ओबीसींचा मेळावा होतोय, त्यात धनगर आरक्षणाला ओबीसी नेत्यांनीज पाठिंबा द्यावा अन्यथा या पुढे आम्हाला गृहित धरू नका असं आव्हान बाळासाहेब दोडतले यांनी दिले आहे.

दरम्यान, धनगर समाजाला सरकारने दिलेले आश्वासन पाळले नाही. राज्यात धनगर समाज हा सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा समाज आहे. त्याचा हा अपमान आहे. मधल्या काळात बैठका घेते, वेगळी भूमिका घेते आणि प्रत्यक्षात वेगळा निर्णय घेते. त्यामुळे राज्य सरकारबद्दल धनगर समाजाच्या भावना तीव्र आहेत. त्याचे पडसाद येणाऱ्या काळात राज्यात दिसतील. धनगरांच्या आक्रोशाला सरकारला सामोरे जावे लागेल. धनगर समाजाचे युवक गावात पुढाऱ्यांना फिरू देणार नाही असा इशाराही यशवंत सेनेने दिला आहे.

टॅग्स :Dhangar Reservationधनगर आरक्षण