शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

आगरकोट किल्ला होणार नामशेष?; डागडुजी करण्याची रेवदंडाकरांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 06:33 IST

पुरातत्व खात्याने या किल्ल्याची डागडुजी करावी, स्थानिक आणि दुर्गप्रेमींची मागणी

रेवदंडा : ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला रेवदांडा गावातील आगरकोट किल्ला ढासळत आहे. पुरातत्व खात्याने या किल्ल्याची डागडुजी करावी, जेणेकरून हा वारसा जोपासता येईल, अशी मागणी स्थानिकांसोबतच दुर्गप्रेमी करत आहेत.पोर्तुगीज, इंग्रज आणि मराठे या सत्तांच्या ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला किल्ल्यांचा विशेष तटबंदीसारखा भाग अखेरीची घटका मोजत आहे. साधारण १६व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांचे आगमन या भागात झाले. काही वर्षांचा काळ सोडल्यास अनेक दशके त्यांनी या भागावर सत्ता राखली. सन १५२४ मध्ये हा किल्ला बांधल्याच्या नोंदी सापडतात. मराठ्यांनी पण हा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना तो जिंकता आला नाही. दरम्यान, एका तहानुसार रेवदंडा मराठ्यांकडे आला. सन १८१८ मध्ये त्याचा ताबा मराठ्यांकडे गेला.सातखणी बुरूज पर्यटकांचे आकर्षणकुंडलिका खाडीच्या बाजूने किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. पुरातत्व खाते किल्ल्यातील काही वास्तूंची दरवर्षी स्वच्छता मोहीम राबवत जाते. किल्ल्यातील सातखणी बुरूज पर्यटकांचे महत्त्वाचे आकर्षण असून, ही वास्तू पहायला हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात. किल्ल्यांची तटबंदी अनेक ठिकाणी तडे जाऊन भरतीच्या पाण्याने मारा खात असल्याने पडझड झाली आहे. या तटबंदीची दखल पुरातत्व खात्याने घ्यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :FortगडMaharashtraमहाराष्ट्र