शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

लेखी आश्वासनानंतर धर्मा पाटील यांचा मृतदेह घेतला ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 06:08 IST

सौरऊर्जा प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींचे फेरमूल्यांकन करून योग्य मोबदला दिला जाईल, असे लेखी आश्वासन सरकारकडून मिळाल्यानंतर, धर्मा पाटील यांचा मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतला. मंगळवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर विखरण (जि.धुळे) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/धुळे : सौरऊर्जा प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींचे फेरमूल्यांकन करून योग्य मोबदला दिला जाईल, असे लेखी आश्वासन सरकारकडून मिळाल्यानंतर, धर्मा पाटील यांचा मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतला. मंगळवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर विखरण (जि.धुळे) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.धर्मा पाटील यांचे निधन ही सरकारी हत्या असून, सरकारविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.धुळे जिल्ह्यातील दोंडाई येथे उभारण्यात येणाºया सौरऊर्जा (पूर्वीचा औष्णिक) प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी प्राण पणाला लावून थेट मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करणारे विखरण येथील वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील (वय ८०) यांनी, २२ जानेवारी रोजी मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तातडीने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. धर्मा पाटील यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले. मात्र, वडिलांना योग्य न्याय मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांचे पुत्र नरेंद्र्र पाटील यांनी घेतली होती. हे प्रकरण अंगलट येणार असे दिसताच, घाईघाईत पत्रकार परिषद घेत, या प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींचे फेरमूल्यांकन सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. तसे लेखी आश्वासन पाटील कुटुंबीयांना देण्यात आले, तर धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल आणि मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने जे. जे. रुग्णालयात जाऊन नरेंद्र पाटील यांची भेट घेतली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. स्वत: मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र पाटील यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. या घडामोडीनंतर नातेवाईक धर्मा पाटील यांचा मृतदेह ताब्यात घेऊन धुळ्याकडे रवाना झाले.हत्येचा गुन्हा दाखल कराहे सरकार गेंड्यांच्या कातडीचे असून, शेतकºयांना न्याय देऊ शकत नाही. या प्रकरणी तहसीलदार, जिल्हाधिकाºयांना तातडीने निलंबित केले पाहिजे.- धनंजय मुंडे,विरोधी पक्षनेते, विधान परिषदधर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या असून, या प्रकरणी सरकारविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल केला पाहिजे.- अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

टॅग्स :Dharma Patilधर्मा पाटीलFarmerशेतकरी