शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

लेखी आश्वासनानंतर धर्मा पाटील यांचा मृतदेह घेतला ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 06:08 IST

सौरऊर्जा प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींचे फेरमूल्यांकन करून योग्य मोबदला दिला जाईल, असे लेखी आश्वासन सरकारकडून मिळाल्यानंतर, धर्मा पाटील यांचा मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतला. मंगळवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर विखरण (जि.धुळे) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/धुळे : सौरऊर्जा प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींचे फेरमूल्यांकन करून योग्य मोबदला दिला जाईल, असे लेखी आश्वासन सरकारकडून मिळाल्यानंतर, धर्मा पाटील यांचा मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतला. मंगळवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर विखरण (जि.धुळे) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.धर्मा पाटील यांचे निधन ही सरकारी हत्या असून, सरकारविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.धुळे जिल्ह्यातील दोंडाई येथे उभारण्यात येणाºया सौरऊर्जा (पूर्वीचा औष्णिक) प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी प्राण पणाला लावून थेट मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करणारे विखरण येथील वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील (वय ८०) यांनी, २२ जानेवारी रोजी मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तातडीने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. धर्मा पाटील यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले. मात्र, वडिलांना योग्य न्याय मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांचे पुत्र नरेंद्र्र पाटील यांनी घेतली होती. हे प्रकरण अंगलट येणार असे दिसताच, घाईघाईत पत्रकार परिषद घेत, या प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींचे फेरमूल्यांकन सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. तसे लेखी आश्वासन पाटील कुटुंबीयांना देण्यात आले, तर धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल आणि मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने जे. जे. रुग्णालयात जाऊन नरेंद्र पाटील यांची भेट घेतली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. स्वत: मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र पाटील यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. या घडामोडीनंतर नातेवाईक धर्मा पाटील यांचा मृतदेह ताब्यात घेऊन धुळ्याकडे रवाना झाले.हत्येचा गुन्हा दाखल कराहे सरकार गेंड्यांच्या कातडीचे असून, शेतकºयांना न्याय देऊ शकत नाही. या प्रकरणी तहसीलदार, जिल्हाधिकाºयांना तातडीने निलंबित केले पाहिजे.- धनंजय मुंडे,विरोधी पक्षनेते, विधान परिषदधर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या असून, या प्रकरणी सरकारविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल केला पाहिजे.- अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

टॅग्स :Dharma Patilधर्मा पाटीलFarmerशेतकरी