शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर फोन बंद केला अन्...; शिंदे गटातील आमदाराचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 13:01 IST

मी शिवसेनेत अडीच वर्षापूर्वी आमदार झालोय. जे सेनेत २५-३० वर्ष धनुष्यबाणावर निवडून आलेत. ज्यांनी खुर्चीवर असताना शिंदेंच्या भूमिकेला पाठिंबा दिला त्यांना पहिल्या टप्प्यात संधी देण्यात आली असं शहाजी पाटलांनी म्हटलं.

पंढरपूर - शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा मंगळवारी पार पडला. पहिल्या टप्प्यात १८ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यात भाजपाचे ९ आणि शिंदे गटाचे ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीत स्थान न मिळाल्यानं शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा समोर आली. त्यात बच्चू कडू यांच्यासारख्या आमदारांनी थेट जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली. 

शिंदे गटातील सर्वात लोकप्रिय आमदार असलेले शहाजी पाटील हेदेखील मंत्रिमंडळात नाव नसल्याने नाराज आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यात शहाजी पाटील यांचा फोन बंद असल्याने अनेक तर्कवितर्क लढवले गेले. या परिस्थितीवर भाष्य करताना शहाजी पाटील म्हणाले की, माझा फोन नॉटरिचेबल नव्हता. तो लागला नसेल. काल सकाळपासून गडबडीत होतो. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर शपथविधीला गेलो. शपथविधी झाल्यानंतर मी फोन बंद केला आणि गावाकडे निघून आलो. मी नाराज वैगेरे नाही. मी नाराज असण्याचं काही कारण नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच मी शिवसेनेत अडीच वर्षापूर्वी आमदार झालोय. जे सेनेत २५-३० वर्ष धनुष्यबाणावर निवडून आलेत. ज्यांनी खुर्चीवर असताना शिंदेंच्या भूमिकेला पाठिंबा दिला त्यांना पहिल्या टप्प्यात संधी देण्यात आली. सर्वव्यापक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. मी जेव्हा मुंबईकडे गेलो त्याचवेळी मी बैठकीला चाललोय मंत्रिपदाची अपेक्षा करू नका असं कार्यकर्त्यांना सांगितले होते असं आमदार शहाजी पाटील यांनी सांगितले. 

त्याचसोबत एखाद्या आरोपात पोलिसांनी क्लीनचीट दिल्यानंतरही एखाद्या नेत्यावर आरोप करून त्यांचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करणार आहात का? पोलिसांनी चौकशीनंतर राठोड यांना आरोपातून मुक्त केलेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची संधी दिली. अब्दुल सत्तारांची चौकशी होईल त्यानंतर पुढे जोकाही निर्णय असेल मुख्यमंत्री घेतली. शिवसेनेने गळ टाकून ठेवला आहे. परंतु २०-२५ वर्ष कोणी हाती लागणार नाही. आम्ही ५० जण घट्ट आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवणार आहोत असंही शहाजी पाटलांनी उद्धव ठाकरे गटातील नेत्यांना टोला लगावला. 

दरम्यान, आमचं बंड नव्हे शिवसेना वाचवण्यासाठी क्रांती आहे. शिंदे यांनी जी भूमिका घेतली त्याला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. जर हा निर्णय घेतला नसता तर आगामी निवडणुकात शिवसेना रसातळाला गेली असती. अद्याप मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण झाले नाही. त्यामुळे पूर्ण विस्तार झाल्यानंतर काय परिस्थिती असेल त्यावर बोलू असं शहाजी पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार