शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर फोन बंद केला अन्...; शिंदे गटातील आमदाराचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 13:01 IST

मी शिवसेनेत अडीच वर्षापूर्वी आमदार झालोय. जे सेनेत २५-३० वर्ष धनुष्यबाणावर निवडून आलेत. ज्यांनी खुर्चीवर असताना शिंदेंच्या भूमिकेला पाठिंबा दिला त्यांना पहिल्या टप्प्यात संधी देण्यात आली असं शहाजी पाटलांनी म्हटलं.

पंढरपूर - शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा मंगळवारी पार पडला. पहिल्या टप्प्यात १८ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यात भाजपाचे ९ आणि शिंदे गटाचे ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीत स्थान न मिळाल्यानं शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा समोर आली. त्यात बच्चू कडू यांच्यासारख्या आमदारांनी थेट जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली. 

शिंदे गटातील सर्वात लोकप्रिय आमदार असलेले शहाजी पाटील हेदेखील मंत्रिमंडळात नाव नसल्याने नाराज आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यात शहाजी पाटील यांचा फोन बंद असल्याने अनेक तर्कवितर्क लढवले गेले. या परिस्थितीवर भाष्य करताना शहाजी पाटील म्हणाले की, माझा फोन नॉटरिचेबल नव्हता. तो लागला नसेल. काल सकाळपासून गडबडीत होतो. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर शपथविधीला गेलो. शपथविधी झाल्यानंतर मी फोन बंद केला आणि गावाकडे निघून आलो. मी नाराज वैगेरे नाही. मी नाराज असण्याचं काही कारण नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच मी शिवसेनेत अडीच वर्षापूर्वी आमदार झालोय. जे सेनेत २५-३० वर्ष धनुष्यबाणावर निवडून आलेत. ज्यांनी खुर्चीवर असताना शिंदेंच्या भूमिकेला पाठिंबा दिला त्यांना पहिल्या टप्प्यात संधी देण्यात आली. सर्वव्यापक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. मी जेव्हा मुंबईकडे गेलो त्याचवेळी मी बैठकीला चाललोय मंत्रिपदाची अपेक्षा करू नका असं कार्यकर्त्यांना सांगितले होते असं आमदार शहाजी पाटील यांनी सांगितले. 

त्याचसोबत एखाद्या आरोपात पोलिसांनी क्लीनचीट दिल्यानंतरही एखाद्या नेत्यावर आरोप करून त्यांचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करणार आहात का? पोलिसांनी चौकशीनंतर राठोड यांना आरोपातून मुक्त केलेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची संधी दिली. अब्दुल सत्तारांची चौकशी होईल त्यानंतर पुढे जोकाही निर्णय असेल मुख्यमंत्री घेतली. शिवसेनेने गळ टाकून ठेवला आहे. परंतु २०-२५ वर्ष कोणी हाती लागणार नाही. आम्ही ५० जण घट्ट आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवणार आहोत असंही शहाजी पाटलांनी उद्धव ठाकरे गटातील नेत्यांना टोला लगावला. 

दरम्यान, आमचं बंड नव्हे शिवसेना वाचवण्यासाठी क्रांती आहे. शिंदे यांनी जी भूमिका घेतली त्याला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. जर हा निर्णय घेतला नसता तर आगामी निवडणुकात शिवसेना रसातळाला गेली असती. अद्याप मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण झाले नाही. त्यामुळे पूर्ण विस्तार झाल्यानंतर काय परिस्थिती असेल त्यावर बोलू असं शहाजी पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार