शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

बीआरएसच्या महाराष्ट्र विस्ताराला धक्का; तेलंगणातील पराभवामुळे बॅकफूटवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 10:20 IST

तेलंगणा हे महाराष्ट्राला लागून असलेले राज्य. आपल्याकडील काही जिल्ह्यांच्या सीमा या राज्याला लागून आहेत.

मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राष्ट्र समिती या त्यांच्या पक्षाचे बारसे भारत राष्ट्र समिती (बीआरएस) असे करून राष्ट्रीय पटलावर जाण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्यासाठी त्यांनी पहिले पाऊल टाकले ते महाराष्ट्रात. मात्र, आज त्यांच्याच राज्यात त्यांचा दारूण पराभव झाल्याने महाराष्ट्रात आता विस्तार होण्याऐवजी संकोचाची शक्यता अधिक आहे. 

तेलंगणा हे महाराष्ट्राला लागून असलेले राज्य. आपल्याकडील काही जिल्ह्यांच्या सीमा या राज्याला लागून आहेत. भाजप, काँग्रेससह काही लहान पक्षांचे दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील नेते, प्रमुख कार्यकर्ते यांना आपल्याकडे खेचण्याचे काम राव यांनी महाराष्ट्रात सुरू केले. बीआरएसमुळे कोणाला कुठे फटका बसणार याचे विश्लेषण सुरू झाले. तेलंगणामध्ये घेतलेले लोकाभिमुख निर्णय जाहिरातींच्या माध्यमातून राव यांनी महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचवले. मोठ्या सभादेखील घेतल्या. आमदार, मंत्र्यांसह पाचशे गाड्यांचा ताफा घेऊन ते आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये आले होते. 

माजी आमदार, माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य असे बरेच जण राव यांच्या गळाला लागले. प्रत्येक जिल्ह्यातील मोठ्या पक्षाच्या असंतुष्टांना सोबत घेण्याची रणनीतीही या पक्षाने आखली होती. लोकसभा निवडणुकीत हाच फाॅर्म्युला वापरून आव्हान उभे करण्याची तयारी पक्षाने चालविली होती. मात्र, आता तेलंगणामधील पराभवामुळे ते बॅकफूटवर गेले आहेत. आता सत्ताहीन झालेल्या बीआरएसला या आघाडीवर अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. 

पराभवाचे कारणराव यांच्या पक्षात असलेले माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी स्वत:च्या आमदार, खासदारांना न भेटणे, एककल्ली कारभार करणे यामुळे राव यांचा पराभव झाल्याची प्रतिक्रिया दिली. राव यांनी राबविलेल्या योजना जनहिताच्या होत्या, पण मनमानी करणे त्यांना पराभवाकडे घेऊन गेले असे ते म्हणाले.

तेलंगणामध्ये पराभव झाला म्हणून बीआरएसच्या विस्ताराला मर्यादा येतील असे मला वाटत नाही. के.चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात आणलेल्या लोकहिताच्या योजना महाराष्ट्रात राबविल्यास जनकल्याण होईल, अशी मोठी भावना लोकांमध्ये आहे. राव नक्कीच जोमाने परत येतील, त्यासाठीचा माार्ग महाराष्ट्रातून जाईल.- शंकरअण्णा धोंडगे, बीआरएस, महाराष्ट्र अध्यक्ष, माजी आमदार.

टॅग्स :telangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३BRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समितीMaharashtraमहाराष्ट्र