शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
3
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
4
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
5
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
6
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
7
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंचा डच्चू?
8
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
9
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
10
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
11
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
14
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
15
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
16
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
17
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
18
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
19
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
20
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?

पाच वर्षे मानधन मगच कायम, राज्य शासनाचा फॉर्म्युला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 5:40 AM

आधी पाच वर्षे मानधनावर नोकरी करा, त्यानंतर तुमची पात्रता व कामगिरी तपासून तुम्हाला नियमित वेतनश्रेणी लागू केली जाईल, असा राज्य शासनातील नवीन ३६ हजार पदे भरतानाचा फॉर्म्युला असेल.

मुंबई : आधी पाच वर्षे मानधनावर नोकरी करा, त्यानंतर तुमची पात्रता व कामगिरी तपासून तुम्हाला नियमित वेतनश्रेणी लागू केली जाईल, असा राज्य शासनातील नवीन ३६ हजार पदे भरतानाचा फॉर्म्युला असेल. या फॉर्म्युल्याला अधिकारी, कर्मचारी संघटनांनी विरोध दर्शविला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या घोषणेत राज्य शासकीय सेवेत पहिल्या वर्षी ३६ हजार तर दुसऱ्या वर्षी ३६ हजार अशी ७२ हजार पदे भरण्यात येतील, असे जाहीर केले होते. त्यानुसार वित्त विभागाने गुरुवारी काढलेल्या शासन निर्णयात ही पदे मानधन तत्त्वावर पाच वर्षांसाठी भरण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.कृषी आणि ग्रामविकास हे दोन विभाग सक्षम करून त्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय विकास, ग्रामविकास, सार्वजनिक आरोग्य, गृह, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, मृद व जलसंधारण आणि वित्त विभागातील पदे भरण्यात येतील. पाच वर्षांपर्यंत अधिकारी, कर्मचाºयांना मानधनावर घेतल्याने सरकारवर कमी आर्थिक बोजा पडणार आहे. सातवा वेतन आयोग नवीन कर्मचाºयांना किमान पाच वर्षे तरी लागू करण्याची त्यामुळे आवश्यकता नसेल. त्यामुळे त्याही आर्थिक जबाबदारीतून सरकारची सुटका होणार आहे.राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग. दि. कुलथे यांनी पाच वर्षे मानधनावर कर्मचारी भरती करण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. नवीन कर्मचाºयांना पहिल्या दिवसापासूनच वेतनश्रेणी लागू केली पाहिजे, ही महासंघाची मागणी असल्याचे ते म्हणाले.>शिक्षण सेवकांच्या धर्तीवर होणार भरतीशिक्षण सेवक, कृषी सेवक, ग्राम सेवकांची भरती ही आघाडी सरकारच्या काळापासूनच सुरुवातीला मानधन तत्त्वावर आणि नंतर कायमस्वरुपी नोकरी अशी केली जाते. मात्र, आता या सरकारने पद भरतीसाठी पाच वर्षांच्या मानधनाचा फॉर्म्युला पहिल्यांदाच आणला आहे.पहिल्या वर्षी ३६ हजार तर दुसºया वर्षी ३६ हजार अशी ७२ हजार पदे भरण्यात येतील. एरवी किरकोळ महत्त्वाचे शासकीय निर्णयही शासनाच्या वेबसाइटवर टाकले जातात पण पद भरतीबाबतचा जीआर वित्त विभागाने वेबसाईटवर टाकण्याचे टाळले.