शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

समीर वानखेडेंवरील FIR नंतर, नवाब मलिकांना आलेल्या अज्ञात पत्राची चर्चा, कोणी पाठवलेले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 09:16 IST

मलिक यांनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर केले होते. यावेळी ते रोज पत्रकार पऱिषद घेऊन वानखेडेंचा बुरखा फाडत होते. तेव्हा मलिक आणि वानखेडेंचा वाद हा वैयक्तीक असल्यासारखे पाहिले जात होते.

एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे, माजी एसपी व्ही. व्ही. सिंह आणि माजी इंटेलिजन्स अधिकारी आशिष रंजन यांच्यावर सीबीआयने आर्यन खान प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा एफआयआर दाखल झाला आहे. यामुळे त्यांनी यापूर्वी तपास केलेल्या अन्य प्रकरणांवर काही परिणाम होणार का, याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. याचे कारण एनसीबीच्याच एका अज्ञात अधिकाऱ्याने राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक यांना पत्र लिहून वानखेडेंच्या २६ कारनाम्यांचा भांडाफोड केला होता. यामध्येच एक केस होती ती अभिनेत्री रिया चक्रवर्तीची.

आर्यन खान क्रूझवर येणार याची समीर वानखेडेंना माहितीही नव्हती, जेव्हा समजले...; इनसाईड स्टोरी

या पत्रातील दाव्यानुसार रिया चक्रवर्ती प्रकरणात आरोपींनी चुकीच्या पद्धतीने अडकविण्यात आले आहे. वानखेडे यांनी दिनेश चव्हाण (सुपरिंटेंडेंट ऑपरेशन) यांना करण अरोरा, जैद विला अबास लखानी यांच्या कबुलीनाम्यात रिया व तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा आदींची नावे लिहिन्यास सांगितले होते. परंतू चव्हाण यांनी त्यास नकार दिला. यामुळे वानखेडेंनी त्यांना हटवून विश्वासून सिंह यांना ऑपरेशनची जबाबदारी दिली. या दोघांनी मिळून नंतर एडीपीएसच्या कलम २७ए चा दुरुपयोग केला आणि निर्दोष लोकांना त्यात अडकवले. सिंह यांना गेल्या आठवड्यातच नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. 

मलिक यांनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर केले होते. यावेळी ते रोज पत्रकार पऱिषद घेऊन वानखेडेंचा बुरखा फाडत होते. तेव्हा मलिक आणि वानखेडेंचा वाद हा वैयक्तीक असल्यासारखे पाहिले जात होते. मात्र, सीबीआयने जो एफआयआर दाखल केला त्यानंतर मलिक यांचे अनेक आरोप खरे ठरत असल्याचे दिसत आहेत. यामुळे जेव्हा याचा खटला सुरु होईल तेव्हा वानखेडेंच्या या अन्य प्रकरणांच्या चौकशांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता आहे. 

खटला सुरू होण्यापूर्वी न्यायालयात आरोप निश्चित केले जातात. त्यावेळी आरोपपत्रात केलेल्या आरोपांविरोधात आरोपी वकिलामार्फत प्रश्न उपस्थित करू शकतात. खटला सुरू होण्यापूर्वीच न्यायालय आरोपी म्हणून त्याचे नाव वगळू शकते. आरोपपत्र दाखल करणे आणि आरोप निश्चित करणे यामध्ये बराच कालावधी असल्याने अनेक जण परिस्थिती बदलाच्या कारणास्तव आरोप रद्द करण्यासाठी किंवा सत्र न्यायालयात दोषमुक्तीची मागणी करण्यासाठी थेट उच्च न्यायालयात जातात, असे निवृत्त एसीपी संजय परांडे यांनी सांगितले. 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकSameer Wankhedeसमीर वानखेडेNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोAryan Khanआर्यन खान