शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

नाल्यापाठोपाठ आता गटारेही होणार मोकळी!

By admin | Updated: August 5, 2016 03:08 IST

शहराच्या विविध भागांत रविवारी झालेल्या पावसानंतर ठिकठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या होत्या

ठाणे : शहराच्या विविध भागांत रविवारी झालेल्या पावसानंतर ठिकठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या होत्या; अरुंद असलेल्या कल्व्हर्टमुळेच पाणी साचल्याचा दावा पालिकेने केला. परंतु, गटारांमधून पाण्याचा निचरा न झाल्याने ही वेळ आल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे गटारावरील बांधकामांवर पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. आॅक्टोबरपासून अशा सर्व बांधकामांवर हातोडा टाकण्याचा निर्णय पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.घोडबंदर भागात नव्याने विकसित करण्यात आलेल्या रस्त्यांमध्येही गुडघाभर पाणी साचले होते. काही ठिकाणी मोठे कल्व्हर्ट, तर काही ठिकाणी छोटे कल्व्हर्ट अशामुळे या भागात पाणी साचल्याची माहिती आता समोर आली आहे. गटारातील गाळ सध्या काढण्याचे काम सुरू असून यामधून बाटल्यांसह इतर साहित्य बाहेर काढले जात आहे. गटारांची सफाईच वेळेत न झाल्याने ही वेळ आल्याचेही आता बोलले जात आहे. परंतु, काही ठिकाणी गटारांवरच असलेल्या बांधकामांमुळे गटारातील घाण काढणे शक्य होत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच पावसाळ्यानंतर गटारावरील बांधकामांवर हातोडा टाकण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यापूर्वी नाल्यावरील बांधकामे तोडण्याची मोहीम पालिकेने राबवली. अनेक नाल्यांवरील बांधकामे पाडण्यात आली. त्याचाच आधार घेत जी बांधकामे संपूर्णपणे गटारावर असतील, त्यांच्यावर सुरुवातीला हातोडा टाकला जाईल. >आधी होणार सर्वेक्षणठाण्यातील कोणकोणत्या भागात गटारावर अशा प्रकारे किती बांधकामे आहेत, याचा सर्व्हे येत्या काही दिवसांत केला जाणार आहे. त्यानंतर प्रभाग समितीनिहाय या बांधकामांवर हातोडा टाकण्यात येणार आहे. पावसाळ्यानंतर खाडीच्या आतमध्ये शिरकाव करून अतिक्रमण झालेल्या बांधकामांवरदेखील हातोडा टाकण्यात येणार आहे.