शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

नाल्यापाठोपाठ आता गटारेही होणार मोकळी!

By admin | Updated: August 5, 2016 03:08 IST

शहराच्या विविध भागांत रविवारी झालेल्या पावसानंतर ठिकठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या होत्या

ठाणे : शहराच्या विविध भागांत रविवारी झालेल्या पावसानंतर ठिकठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या होत्या; अरुंद असलेल्या कल्व्हर्टमुळेच पाणी साचल्याचा दावा पालिकेने केला. परंतु, गटारांमधून पाण्याचा निचरा न झाल्याने ही वेळ आल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे गटारावरील बांधकामांवर पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. आॅक्टोबरपासून अशा सर्व बांधकामांवर हातोडा टाकण्याचा निर्णय पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.घोडबंदर भागात नव्याने विकसित करण्यात आलेल्या रस्त्यांमध्येही गुडघाभर पाणी साचले होते. काही ठिकाणी मोठे कल्व्हर्ट, तर काही ठिकाणी छोटे कल्व्हर्ट अशामुळे या भागात पाणी साचल्याची माहिती आता समोर आली आहे. गटारातील गाळ सध्या काढण्याचे काम सुरू असून यामधून बाटल्यांसह इतर साहित्य बाहेर काढले जात आहे. गटारांची सफाईच वेळेत न झाल्याने ही वेळ आल्याचेही आता बोलले जात आहे. परंतु, काही ठिकाणी गटारांवरच असलेल्या बांधकामांमुळे गटारातील घाण काढणे शक्य होत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच पावसाळ्यानंतर गटारावरील बांधकामांवर हातोडा टाकण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यापूर्वी नाल्यावरील बांधकामे तोडण्याची मोहीम पालिकेने राबवली. अनेक नाल्यांवरील बांधकामे पाडण्यात आली. त्याचाच आधार घेत जी बांधकामे संपूर्णपणे गटारावर असतील, त्यांच्यावर सुरुवातीला हातोडा टाकला जाईल. >आधी होणार सर्वेक्षणठाण्यातील कोणकोणत्या भागात गटारावर अशा प्रकारे किती बांधकामे आहेत, याचा सर्व्हे येत्या काही दिवसांत केला जाणार आहे. त्यानंतर प्रभाग समितीनिहाय या बांधकामांवर हातोडा टाकण्यात येणार आहे. पावसाळ्यानंतर खाडीच्या आतमध्ये शिरकाव करून अतिक्रमण झालेल्या बांधकामांवरदेखील हातोडा टाकण्यात येणार आहे.