शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

सत्तेत येताच ‘भाऊ’,‘दादां’चे शब्द फिरले

By admin | Updated: July 18, 2015 00:58 IST

‘भू-विकास’ पुनरुज्जीवनाचा प्रश्न : ‘त्या’ खरमरीत पत्राचे काय करायचे ?

कोल्हापूर : विरोधी पक्षात असताना भू-विकास बँकांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी विधिमंडळ हलवून सोडणारे सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांतदादा पाटील व सभागृहाबरोबर या प्रश्नावर आघाडी सरकारला धारेवर धरणारे राजू शेट्टी यांचे सत्तेत आल्यानंतर ‘शब्द’ फिरले. सरकार येऊन सहा महिने व्हायच्या आतच भू-विकास बँका अवसायनात काढण्याचा निर्णय घेऊन आपण काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा वेगळे नाही, हे राज्यातील शेतकऱ्यांना दाखवून दिले. शेतकऱ्यांना बांधावर जाऊन दीर्घमुदतीने कर्जपुरवठा करण्याचे काम भू-विकास बँकेने केले. अल्प व्याजदर, केवळ सात-बारा पाहून विना जामीनदार कर्जपुरवठा या बँकेच्या माध्यमातून झाला. या बँकेमुळेच जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना उभ्या राहिल्या आणि मोठ्या प्रमाणात शेती सिंचनाखाली आली, पण दुर्दैवाने सरकारच्या धोरणाची बळी ही बँक पडली. काँग्रेस आघाडी सरकारने राज्यातील १८ जिल्हा बँका अवसायनात काढल्या. ही बँक वाचली पाहिजे, यासाठी गेले पाच-सहा वर्षे सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह शिवसेना-भाजपच्या आमदारांनी रान उठविले. सरकारला ‘भाऊ’, ‘दादां’बरोबर खासदार राजू शेट्टी यांनी खरमरीत शब्दांत पत्रे लिहिली. बँकेच्या सुदैवाने युतीचे सरकार आले आणि मुनगंटीवार यांच्याकडे अर्थ तर चंद्रकांतदादांकडे सहकार खाते आले. त्यामुळे प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा होती, पण सत्तेवर आल्यानंतर सहा महिन्यांच्या आतच ‘भू-विकास’ अवसायनात काढण्याचा निर्णय घेतला. नेत्यांनी ‘शब्द’ फिरविल्याने बँक कर्मचाऱ्यांबरोबर शेतकऱ्यांनाही वाऱ्यावर सोडले आहेत. राजकीय नेतेमंडळींचा शेतकऱ्यांबद्दलचा जिव्हाळा, प्रेम हे कसे फसवे असते, याचे उत्तम उदाहरण यापेक्षा दुसरे असणार नाही. येणे-देणे न बघताच निर्णय‘भू-विकास’कडून १९०० कोटी येणे असल्याचे सांगत राज्य सरकारने अवसायनात काढण्याचा निर्णय घेतला, पण सरकारकडून या बँकांना जवळपास १३०० कोटी येणे आहे. हे नेमलेल्या समितीने दाखवून दिले, पण ऐकून कोण घेतो. बँकांच्या मालमत्तेवर डोळा असल्याने मागील सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत युती सरकारने निर्णय घेतल्याचा आरोप बँक कर्मचाऱ्यांसह शेतकऱ्यांमधून होत आहे. न्यायालयात जाणार : पाटील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने राज्यातील १८ भू-विकास बँका अवसायनात काढल्या होत्या. त्याला न्यायालयाची स्थगिती असताना युती सरकारने पुन्हा हा निर्णय घेतला आहे. याविरोधात लवकरच न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती भू-विकास बँकेचे अध्यक्ष एम. एम. पाटील यांनी दिली. दीर्घमुदतीचा कर्जपुरवठा बंद झाल्याने पर्यायाने भू-विकास बँकांकडून होणारे सुलभ कर्जवाटप थांबल्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचेही त्यांनी सांगितले.