शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Ayodhya Verdict : कोल्हापूरने उभारली सामंजस्याची गुढी, शहरातील दैनंदिन व्यवहार नियमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 12:06 IST

अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातही सर्वत्र अत्यंत सौहार्दाचे आणि एकोप्याचे वातावरण असून कोल्हापूर जिल्ह्याने सामंजस्याची गुढी उभारल्याचे चित्र या क्षणी आहे.

ठळक मुद्देअयोध्या निकालानंतर : कोल्हापूरने उभारली सामंजस्याची गुढीशहरातील दैनंदिन व्यवहार नियमित

कोल्हापूर : अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातही सर्वत्र अत्यंत सौहार्दाचे आणि एकोप्याचे वातावरण असून कोल्हापूर जिल्ह्याने सामंजस्याची गुढी उभारल्याचे चित्र या क्षणी आहे.गेले चार -पाच दिवस पोलिस प्रशासनाकडून निकालाच्या पार्श्वभूमीवर पुरेशी दक्षता घेण्यात आली होती. त्यासंदर्भातील वृत्तपत्रातील बातम्या वाचून लोकांमध्ये काहीशी भीती होती, परंतु प्रत्यक्ष निकाल लागल्यानंतर मात्र हा तणाव आणि भीती क्षणार्धात निघून गेली.सकाळपासून शहरातील दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणेच सुरु राहिले. शहरातील महाद्वार रोड, शिवाजी चौक, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी या प्रमुख भागातील दुकाने सुरु राहिले, व्यवहारही नियमितपणे सुरु होते. आज, शनिवार असल्यामुळे महाद्वार रोडवरील दुकाने बंद असतात, पण फिरत्या विक्रेत्यांची गर्दी कायम होती.

अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचीही रांग लागली होती. आज, तुळशी विवाह असल्यामुळे अनेक ठिकाणी लग्नासाठी उस, झेंडूची फुले आणि इतर साहित्य घेण्यासाठी लोकांची गर्दी होती. चौका चौकात उभे राहिलेले पोलिसच आज काहीतरी वेगळे असल्याचे जाणवून देत होते.शनिवार असल्यामुळे सकाळची शाळाही नियमितपणे भरल्या. शहर वाहतूक करणारी केएमटी बसही रस्त्यावर धावत होती. कोठेही किचिंतसाही तणाव नव्हता. जणू आज काही वेगळे घडलेलेच नाही, असेच सगळीकडे वातावरण आहे.कोल्हापूर ही शाहू महाराजांच्या विचारांवर पोसलेली पुरोगामी नगरी आहे. येथे धार्मिक ऐक्याचा बंध कायमच मजबूत आहे. त्यामुळेच शहरातील वातावरण सामंजस्याचे राहिले.

कोल्हापूरची जडण घडण राजश्री शाहू महाराजांच्या विचाराने झाली आहे. त्यामुळे या भूमीने कायमच सामाजिक सलोख्याला महत्व दिले आहे. अयोध्या निकालाचा सर्व समाज बांधवांनी आदर ठेवून सामंजस्याची परंपरा कायम राखली हेच कोल्हापूरचे वैशिष्ट्य आहे.- संभाजीराजे छत्रपती,खासदार, कोल्हापूर.

न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करण्याची भूमिका सर्व मुस्लिम धर्मगुरुंनी घेतली होती. त्याला अनुसरुन अयोध्याच्या निकालाचे स्वागत करतो, कोण हरले आणि कोण जिंकले असा मुद्दा न करता सर्वांनीच या निकालाचा आदर राखावा, अशी आमची भूमिका आहे.- गणी आजरेकर,नेते, मुस्लिम समाज, कोल्हापूर. 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूरAyodhyaअयोध्या