शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

Ayodhya Verdict : कोल्हापूरने उभारली सामंजस्याची गुढी, शहरातील दैनंदिन व्यवहार नियमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 12:06 IST

अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातही सर्वत्र अत्यंत सौहार्दाचे आणि एकोप्याचे वातावरण असून कोल्हापूर जिल्ह्याने सामंजस्याची गुढी उभारल्याचे चित्र या क्षणी आहे.

ठळक मुद्देअयोध्या निकालानंतर : कोल्हापूरने उभारली सामंजस्याची गुढीशहरातील दैनंदिन व्यवहार नियमित

कोल्हापूर : अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातही सर्वत्र अत्यंत सौहार्दाचे आणि एकोप्याचे वातावरण असून कोल्हापूर जिल्ह्याने सामंजस्याची गुढी उभारल्याचे चित्र या क्षणी आहे.गेले चार -पाच दिवस पोलिस प्रशासनाकडून निकालाच्या पार्श्वभूमीवर पुरेशी दक्षता घेण्यात आली होती. त्यासंदर्भातील वृत्तपत्रातील बातम्या वाचून लोकांमध्ये काहीशी भीती होती, परंतु प्रत्यक्ष निकाल लागल्यानंतर मात्र हा तणाव आणि भीती क्षणार्धात निघून गेली.सकाळपासून शहरातील दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणेच सुरु राहिले. शहरातील महाद्वार रोड, शिवाजी चौक, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी या प्रमुख भागातील दुकाने सुरु राहिले, व्यवहारही नियमितपणे सुरु होते. आज, शनिवार असल्यामुळे महाद्वार रोडवरील दुकाने बंद असतात, पण फिरत्या विक्रेत्यांची गर्दी कायम होती.

अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचीही रांग लागली होती. आज, तुळशी विवाह असल्यामुळे अनेक ठिकाणी लग्नासाठी उस, झेंडूची फुले आणि इतर साहित्य घेण्यासाठी लोकांची गर्दी होती. चौका चौकात उभे राहिलेले पोलिसच आज काहीतरी वेगळे असल्याचे जाणवून देत होते.शनिवार असल्यामुळे सकाळची शाळाही नियमितपणे भरल्या. शहर वाहतूक करणारी केएमटी बसही रस्त्यावर धावत होती. कोठेही किचिंतसाही तणाव नव्हता. जणू आज काही वेगळे घडलेलेच नाही, असेच सगळीकडे वातावरण आहे.कोल्हापूर ही शाहू महाराजांच्या विचारांवर पोसलेली पुरोगामी नगरी आहे. येथे धार्मिक ऐक्याचा बंध कायमच मजबूत आहे. त्यामुळेच शहरातील वातावरण सामंजस्याचे राहिले.

कोल्हापूरची जडण घडण राजश्री शाहू महाराजांच्या विचाराने झाली आहे. त्यामुळे या भूमीने कायमच सामाजिक सलोख्याला महत्व दिले आहे. अयोध्या निकालाचा सर्व समाज बांधवांनी आदर ठेवून सामंजस्याची परंपरा कायम राखली हेच कोल्हापूरचे वैशिष्ट्य आहे.- संभाजीराजे छत्रपती,खासदार, कोल्हापूर.

न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करण्याची भूमिका सर्व मुस्लिम धर्मगुरुंनी घेतली होती. त्याला अनुसरुन अयोध्याच्या निकालाचे स्वागत करतो, कोण हरले आणि कोण जिंकले असा मुद्दा न करता सर्वांनीच या निकालाचा आदर राखावा, अशी आमची भूमिका आहे.- गणी आजरेकर,नेते, मुस्लिम समाज, कोल्हापूर. 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूरAyodhyaअयोध्या