शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल सहा दशकांनंतर बदलणार सरकारी कार्यालयांची कार्यपद्धती; मुख्यमंत्र्यांची सुशासन प्रणालीला मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 11:04 IST

या सुशासन नियमावलीत वातावरणीय बदल आणि त्याचे परिणाम याचादेखील समावेश करण्यात आला आहे. उष्णतेची लाट, अवकाळी पाऊस यासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करून राज्य कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येईल. 

मुंबई : राज्यातील विविध सरकारी कार्यालयांची कार्यपद्धती तब्बल सहा दशकांनंतर आता बदलली जाणार असून गतिमानता व पारदर्शकतेवर भर असलेल्या सुशासन प्रणाली २०२३ ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मान्यता दिली. 

राज्यात १९६३ मध्ये कार्यालयीन कार्यपद्धतीची पहिली नियमावली तयार करण्यात आली होती. तिचा मराठी अनुवाद १९९४ मध्ये करण्यात आला होता. शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ सुलभरीत्या मिळावा. यासाठी सामान्यांच्या समस्या आणि शासकीय कार्यपद्धती यांची सांगड घालावी व अन्य राज्यांसाठी आदर्श ठरेल, अशी सुशासन नियमावली तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी मागील वर्षी सप्टेंबरमध्ये दिल्या होत्या. त्यासाठी निवृत्त तत्कालीन उपलोकायुक्त सुरेश कुमार, माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया, स्वाधीन क्षत्रिय, के. पी. बक्षी, अजितकुमार जैन यांची समितीही नेमण्यात आली होती. समितीने ४३ बैठका घेतल्या, ३५ विभागांना भेटी दिल्या व अहवाल तयार केला. सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी समितीच्या अहवालाचे  सादरीकरण मुख्यमंत्र्यांसमोर केले.

वातावरणीय बदलासाठी स्वतंत्र कक्षया सुशासन नियमावलीत वातावरणीय बदल आणि त्याचे परिणाम याचादेखील समावेश करण्यात आला आहे. उष्णतेची लाट, अवकाळी पाऊस यासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करून राज्य कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येईल. 

नियमावलीत काय आहे? -सरकारी सेवा नागरिकांना जलद व सुलभ मिळणार.-सुशासनाची कामगिरी तपासण्यासाठीचे १६१ निर्देशांक असतील. त्यावरून ही कामगिरी ठरविली जाईल.-एंड टू एंड ऑनलाइन सेवा कालमर्यादेत देण्याची सोय असेल. मानवी हस्तक्षेप संपविणार.-आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या व व्याप्ती वाढविणार.-शासकीय कामकाज ई ऑफिसद्वारे करणार.-सार्वजनिक कागदपत्रांचे डिजिटायझेशन करण्यात येईल.-सध्या एक सरकारी फाइल सहा-सात टप्प्यांमधून जाते. ती यापुढे तीन ते चार टप्प्यांत निकाली काढली जाईल.-निर्णय प्रक्रियेत नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. 

टॅग्स :GovernmentसरकारEknath Shindeएकनाथ शिंदे