शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
5
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
6
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
7
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
8
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
9
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
10
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
11
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
12
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
13
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
14
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
15
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
16
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
17
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
18
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
19
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
20
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...

अखेर आश्रयदात्याचे सांडलेले रक्त व्यर्थ!

By admin | Updated: June 23, 2014 01:18 IST

भरन्यायालयात साक्षीदाराच्या पिंजऱ्यात साक्ष देताना खुद्द मृताची पत्नी आणि मुलगीही फितूर झाल्याने रात्रंदिवस काबाडकष्ट करून कुटुंबाचे पालन करणाऱ्या एका दुर्दैवी आश्रयदात्याचे सांडलेले रक्त

पत्नी व मुलगीही झाली फितूर : गोळी झाडणारा संशयाचा लाभ मिळून निर्दोषराहुल अवसरे - नागपूरभरन्यायालयात साक्षीदाराच्या पिंजऱ्यात साक्ष देताना खुद्द मृताची पत्नी आणि मुलगीही फितूर झाल्याने रात्रंदिवस काबाडकष्ट करून कुटुंबाचे पालन करणाऱ्या एका दुर्दैवी आश्रयदात्याचे सांडलेले रक्त व्यर्थ ठरले. खापरखेडा हद्दीतील सिल्लेवाडा वेकोलि कॅन्टीनसमोर एका पहारेदाराची देशीकट्ट्यातून गोळी झाडून हत्या करणाऱ्या आरोपीची सबळ पुराव्याअभावी संशयाचा लाभ देऊन अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केली. रामकृष्णा देवराव मून (४५) रा. सिल्लेवाडा हवामहल, असे मृताचे नाव होते. भागीरथ रामस्वरूप खरग्याल (२७) रा. खापरखेडा, असे आरोपीचे नाव आहे. २७ नोव्हेंबर २०१२ च्या रात्री ९ ते २८ नोव्हेंबरच्या सकाळी ७ वाजताच्या दरम्यान खुनाची घटना घडली होती. या खटल्याची पार्श्वभूमी अशी, रामकृष्णा हा आधी खाण कामगार होता. मिरगीचा आजार जडल्याने त्याला सिल्लेवाडा वेकोलि कॅन्टीन येथे ‘वॉचमन’चे काम देण्यात आले होते. पत्नी, १९ व १७ वर्षांच्या दोन मुली आणि १२ वर्षांचा मुलगा, असे हे कुटुंब. तो एकटाच या कुटुंबाचा भार वाहत होता. एक मुलगी बी. कॉम. प्रथम वर्षाला तर दुसरी अकराव्या वर्गात शिकायची. मुलगाही आठव्या वर्गात शिकायचा. लहान मुलीचे तिच्या एका मैत्रिणीमार्फत भागीरथसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित झाले होते. भागीरथ हा विवाहित असतानाही त्याने या मुलीपासून ही बाब दडवून ठेवली होतो. खुनाच्या घटनेच्या पाच-सहा महिन्याआधीच त्याने आपल्या पत्नीला कोलकाता येथील माहेरी पाठवून दिले होते. भागीरथ हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्याविरुद्ध मौदा, रामटेक, तुमसर येथे दरोडा आणि जबरीचोरीचे गुन्हे दाखल आहेत. रामकृष्णाला आपल्या मुलीच्या प्रेमसंबंधाबाबत समजताच त्याने भागीरथ याला घरी येण्यास सक्त मनाई केली होती. मुलीलाही त्याने ताकीद दिली होती. वडिलांचा विरोध झुगारून तिचे प्रेमसंबंध सुरूच होते. २७ नोव्हेंबर २०१२ रोजी भागीरथ याने लग्नासाठी या मुलीला कोराडी देवी मंदिरात नेले होते. परंतु तेथील पंडितने वडिलांशिवाय लग्न लावण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याने या मुलीला गायमुख मंदिरात नेऊन आपल्या मित्रांच्या साक्षीने तिच्याशी विवाह केला होता.