शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

खरिप हंगामाचे कृषी कर्जवाटप आचारसंहितेनंतर, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 04:35 IST

राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठकच न झाल्याने राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे कृषीकर्ज रखडल्याची भीती अनाठायी असल्याची बाब राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शुक्रवारी स्पष्ट करण्यात आली.

मुंबई : राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठकच न झाल्याने राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे कृषीकर्ज रखडल्याची भीती अनाठायी असल्याची बाब राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शुक्रवारी स्पष्ट करण्यात आली. या समितीची बैठक २० किंवा २१ मे रोजी घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत सांगितल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.कृषी कर्ज वाटपाचे प्रमाण, विविध बँकांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी या समितीची बैठक आवश्यक असून ती झाल्यानंतर २३ मे रोजी निवडणूक आचारसंहिता संपताच कर्जवाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांवर पूर्वीच असलेल्या कृषी कर्जाच्या वसुलीस आधीच स्थगिती देण्यात आली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थिती, अल-निनोचा परिणाम, पावसासंदर्भातील निरनिराळे अंदाज, विविध धरणांमध्ये असलेला पाणीसाठा, चारा, बियाण्यांच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला.निवडणूक आचारसंहितेचा अडसर असल्याने आम्ही दुष्काळी भागात दौरे केले तरी संबंधित प्रशासकीय यंत्रणेला आदेश देऊ शकत नाही. जनतेच्या रोषाचा आम्हाला सामना करावा लागतो; पण इच्छा असूनही उपाययोजनांबाबत काहीही करता येत नाही, अशी उद्विग्नता काही मंत्र्यांनी आजच्या बैठकीत व्यक्त केल्याची माहिती आहे. एका जिल्हाधिकाºयांनी आचारसंहितेचे कारण देत मंत्र्यांच्या दौºयात जाण्यास नकार दिला. मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही आणि तुम्हीपण माझ्याकडे येऊ नका, असे या जिल्हाधिकाºयांनी म्हटल्याची चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत झाली, अशीही माहिती आहे.ग्रामीण भागातून विशेषत: दुष्काळग्रस्त भागांतून ज्यांनी नवीन रेशन कार्डसाठी अर्ज केले, त्यांना ते तत्काळ जारी करण्यात यावे. रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांना गती देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत दिले.

मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय- रोजगार हमी योजनेखाली कामांच्या मागणीचे प्रस्ताव आल्यास तीन दिवसांत संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून अशा प्रस्तावांना मान्यता देण्यात येईल- दुष्काळी भागातील शिधापत्रिका उपलब्ध नसलेल्या शेतकरी व शेतमजुरांना शिधापत्रिकांचे तातडीने वितरण करणार.- शेळ्या-मेंढ्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर छावण्या सुरू करणार.- दुष्काळग्रस्त गावातील शिधापत्रिका उपलब्ध नसणाºया नागरिकांना त्यांच्या वार्षिक उत्पन्नानुसार देय प्रवर्गातील शिधापत्रिका तत्काळ देणार.

टॅग्स :Mantralayaमंत्रालयagricultureशेती