शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

खरिप हंगामाचे कृषी कर्जवाटप आचारसंहितेनंतर, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 04:35 IST

राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठकच न झाल्याने राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे कृषीकर्ज रखडल्याची भीती अनाठायी असल्याची बाब राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शुक्रवारी स्पष्ट करण्यात आली.

मुंबई : राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठकच न झाल्याने राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे कृषीकर्ज रखडल्याची भीती अनाठायी असल्याची बाब राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शुक्रवारी स्पष्ट करण्यात आली. या समितीची बैठक २० किंवा २१ मे रोजी घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत सांगितल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.कृषी कर्ज वाटपाचे प्रमाण, विविध बँकांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी या समितीची बैठक आवश्यक असून ती झाल्यानंतर २३ मे रोजी निवडणूक आचारसंहिता संपताच कर्जवाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांवर पूर्वीच असलेल्या कृषी कर्जाच्या वसुलीस आधीच स्थगिती देण्यात आली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थिती, अल-निनोचा परिणाम, पावसासंदर्भातील निरनिराळे अंदाज, विविध धरणांमध्ये असलेला पाणीसाठा, चारा, बियाण्यांच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला.निवडणूक आचारसंहितेचा अडसर असल्याने आम्ही दुष्काळी भागात दौरे केले तरी संबंधित प्रशासकीय यंत्रणेला आदेश देऊ शकत नाही. जनतेच्या रोषाचा आम्हाला सामना करावा लागतो; पण इच्छा असूनही उपाययोजनांबाबत काहीही करता येत नाही, अशी उद्विग्नता काही मंत्र्यांनी आजच्या बैठकीत व्यक्त केल्याची माहिती आहे. एका जिल्हाधिकाºयांनी आचारसंहितेचे कारण देत मंत्र्यांच्या दौºयात जाण्यास नकार दिला. मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही आणि तुम्हीपण माझ्याकडे येऊ नका, असे या जिल्हाधिकाºयांनी म्हटल्याची चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत झाली, अशीही माहिती आहे.ग्रामीण भागातून विशेषत: दुष्काळग्रस्त भागांतून ज्यांनी नवीन रेशन कार्डसाठी अर्ज केले, त्यांना ते तत्काळ जारी करण्यात यावे. रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांना गती देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत दिले.

मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय- रोजगार हमी योजनेखाली कामांच्या मागणीचे प्रस्ताव आल्यास तीन दिवसांत संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून अशा प्रस्तावांना मान्यता देण्यात येईल- दुष्काळी भागातील शिधापत्रिका उपलब्ध नसलेल्या शेतकरी व शेतमजुरांना शिधापत्रिकांचे तातडीने वितरण करणार.- शेळ्या-मेंढ्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर छावण्या सुरू करणार.- दुष्काळग्रस्त गावातील शिधापत्रिका उपलब्ध नसणाºया नागरिकांना त्यांच्या वार्षिक उत्पन्नानुसार देय प्रवर्गातील शिधापत्रिका तत्काळ देणार.

टॅग्स :Mantralayaमंत्रालयagricultureशेती