शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

८ तासांनंतर मविआची बैठक संपली; 'इतक्या' जागा जिंकण्याचा निर्धार, राऊत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 19:38 IST

महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक पार पडली. ८ तासाच्या या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली.

मुंबई - महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आणि एकसंघ आहे. आम्ही प्रसन्न मुद्रेने बाहेर आलोय. सकाळी अकरा वाजता बैठकीला बसलो, ७ वाजेपर्यंत ही बैठक चालली. आमची सविस्तर चर्चा झाली. काँग्रेसचे नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेकडून मी, विनायक राऊत, सीपीआयचे प्रतिनिधीही उपस्थित होते. ४८ जागांवर आमची चर्चा झाली. जागावाटप हे सुरळीत पार पडले आहे. कुणालाही चिंता करण्याचे कारण नाही. जे कोणी देव पाण्यात घालून बसलेत त्यांना सांगतो, सगळं काही ठीक आहे. आम्ही ३० तारखेला पुन्हा बैठकीला बसणार आहोत अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. 

महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक पार पडली. ८ तासाच्या या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली. त्यानंतर मविआ नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत बोलले की, वंचित बहुजन आघाडीसोबत आमचे कालपासून संवाद सुरू आहे. आज सकाळीही निमंत्रण पाठवले. त्यानंतर प्रकाश आंबेडकर आणि आमच्या नेत्यांशी चर्चा झाली. येत्या ३० तारखेच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर सहभागी होतील. वंचित बहुजन आघाडी हा मविआचा घटक पक्ष आहे आणि राहील. या देशातील लोकशाही टिकायला हवी. संविधानाची चीरफाड सुरू आहे ते वाचायला हवे. मोदींची एकाधिकारशाही सुरू आहे ती रोखायला हवी. ही भूमिका आमची आहे तशी प्रकाश आंबेडकरांचीही आहे. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत असं राऊतांनी स्पष्ट केले. 

तसेच जागावाटपाबाबत ३० तारखेपर्यंत सर्वकाही निश्चित होईल. कुठल्याही फॉर्म्युल्यावर जाऊ नका. प्रत्येक जागा ही महाविकास आघाडीची असेल. वंचितसह आम्ही तिन्हीही पक्ष एकत्रित काम करणार आहोत. महाराष्ट्रातील ४८ जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न आहे. राजू शेट्टी यांच्यासोबतही आमची चर्चा झाली आहे. प्रत्येक घटक पक्षाच्या मागणीवर आमची चर्चा होईल असंही संजय राऊतांनी सांगितले. 

दरम्यान, बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकारणावरही संजय राऊतांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिले. नीतीश कुमार इंडिया आघाडी सोडणार असल्याची चर्चा आहे असा प्रश्न राऊतांना विचारण्यात आला. त्यावर नीतीश कुमार हे इंडिया आघाडीचे स्तंभ आहेत. ते इंडिया आघाडी सोडणार नाहीत असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीSanjay Rautसंजय राऊतElectionनिवडणूक