शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

स्वस्तात कर्ज, होऊ दे खर्च !

By admin | Updated: September 30, 2015 02:56 IST

सणासुदीच्या तोंडावर जनतेसाठी एक शुभवर्तमान आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने मंगळवारी मांडलेल्या पतधोरणाद्वारे रेपो दरात तब्बल अर्धा टक्क्याची कपात करीत उद्योगांसह सामान्य जनतेला सुखावह धक्का दिला आहे.

मुंबई : सणासुदीच्या तोंडावर जनतेसाठी एक शुभवर्तमान आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने मंगळवारी मांडलेल्या पतधोरणाद्वारे रेपो दरात तब्बल अर्धा टक्क्याची कपात करीत उद्योगांसह सामान्य जनतेला सुखावह धक्का दिला आहे. यामुळे वाहन, गृह यासह विविध प्रकारची कर्जं स्वस्त होणार आहेत. रिझर्व्ह बँकेने केलेल्या घोषणेनुसार, रेपो दर गेल्या चार वर्षांतील सर्वात कमी म्हणजे ६.७५ टक्के इतका झाला आहे. मात्र सीआरआर व अन्य कोणत्याही दरात कपात केलेली नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने केलेल्या दरकपातीच्या घोषणेनंतर स्टेट बँकेसह देशातील काही प्रमुख बँकांनी आपल्या विविध कर्जांवरील व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. या दरकपातीचा फायदा सध्या कर्ज असलेल्या व नव्याने कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या अशा दोन्ही घटकांना होईल. आगामी काळातील दसरा-दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या दरकपातीमुळे प्रामुख्याने बिल्डर, वाहन कंपन्या आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या कंपन्यांकडून ग्राहकांसाठी अधिकाधिक आकर्षक योजना सादर होऊ शकतील. आजच्या दरकपातीचे सरकारसह उद्योगजगताकडून मोठे स्वागत झाले आहे.चालू वर्षात यापूर्वी जानेवारी, मार्च, जून अशा तीन वेळा प्रत्येकी पाव टक्क्याची कपात करूनही त्याचा फारसा लाभ बँकांनी ग्राहकांपर्यंत पोहोचू दिला नव्हता. या पार्श्वभूमीवर बँका जोपर्यंत हा लाभ थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवित नाहीत तोवर दरकपात न करण्याचे संकेत राजन यांनी दिले होते. तसेच त्यांच्या अपेक्षेनुसार महागाई नियंत्रणात आल्याशिवायही दरकपात न करण्याच्या मुद्द्यावर राजन ठाम होते. पंतप्रधान, केंद्रीय वित्तमंत्री, नीती आयोगाचे अध्यक्ष, उद्योगजगत अशा सर्वांनीच दरकपातीची अपेक्षा वारंवार व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर पाव टक्क्याच्या तुलनेत अर्धा टक्का दरकपात करीत राजन यांनी सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे.-----------अपेक्षेपेक्षा जास्त दरकपात केली आहे. तुम्ही सान्ता क्लॉजसारखे आश्चर्यचकित करणारी भेटवस्तू देत आहात, अशी विचारणा राजन यांना पतधोरणासंदर्भातील पत्रकार परिषदेतील केली असता, माहिती नाही, तुम्ही मला काय म्हणता सान्ता क्लॉज किंवा अन्य काही. पण माझे नाव रघुराम राजन आहे आणि मला जे वाटते तेच मी करतो, अशी मार्मिक प्रतिक्रिया राजन यांनी दिली. राजन यांनी पदभार स्वीकारला होता, त्यावेळीदेखील ‘मी गव्हर्नर म्हणून काम करायला आलो आहे, फेसबुकवर लाइक्स वाढवायला आलेलो नाही’, अशीच एक मार्मिक प्रतिक्रिया दिली होती.---------------असा होईल फायदासमजा, एखाद्या व्यक्तीचे १० लाख रुपयांचे २० वर्षं मुदतीसाठीचे गृहकर्ज आहे. सध्या या कर्जाचा व्याजदर १०.५० टक्के इतका आहे. याकरिता त्याला प्रति माह ९,९८४ रुपये इतका हप्ता भरावा लागतो. आजच्या निर्णयानंतर, मासिक हप्त्यात त्याची ३३४ रुपयांची बचत होईल व त्याचा हप्ता ९,६५० रुपयांवर येईल. वर्षभरात ४,००८ रुपयांची बचत होईल.---------------एक लाख कोटींपेक्षा जास्त भांडवल बाजारात> ज्या दराने रिझर्व्ह बँक देशातील बँकांना कर्ज देते, त्या दराला रेपो रेट असे म्हणतात. > ही पाव टक्का कपात झाल्यास किमान ५० हजार कोटी रुपये निधी बँकांच्या हाती उपलब्ध होतात. >राजन यांनी अर्धा टक्का कपात केल्याच्या पार्श्वभूमीवर किमान एक लाख कोटी रुपये बँकांकडे उपलब्ध होतील.------------आता चेंडू सरकारच्या कोर्टातसरकारच्या आणि उद्योगजगताच्या अपेक्षेपेक्षा एक पाऊल पुढे टाकत राजन यांनी व्याजदरात कपात केल्यानंतर अर्थव्यवस्थेला गती देण्याचा चेंडू त्यांनी सरकारच्या कोर्टात टाकला. -वृत्त/७------------रिझर्व्ह बँकेने केलेल्या दरकपातीमुळे अर्थकारणात गती निर्माण होण्यास मदत होईल.- अरुण जेटली