शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

“मनोज जरांगेंना तातडीने अटक करा, पाटील लावता मग आरक्षण कशासाठी हवे?”: गुणरत्न सदावर्ते

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 16:14 IST

Gunratna Sadavarte Vs Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या सभांना केवळ एका जत्रेसारखे पाहतो. त्यांचे बोलणे मग्रुरी आणि माजोरीपणाचे असल्याची टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली.

Gunratna Sadavarte Vs Manoj Jarange Patil: मनोज जरांगे स्वत:ला पाटील म्हणतात. पाटीलकी कोणाकडे असते. उच्च वर्गासाठी पाटीलकी असते. आरक्षण उच्च वर्गासाठी नसते. मनोज जरांगेंचे राजकीय बॉस वेगळेच आहेत. शरद पवार त्यांच्या पाठिशी आहेत. जरांगे पाटील यांना काही ज्ञान नाही. संविधानाचे ज्ञान नाही. काही आकलन नाही, मनोज जरांगे यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी करता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगेंवर हल्लाबोल केला. 

मनोज जरांगे यांना अटक करावी, याबाबत गृहसचिव आणि पोलिसांना गुणरत्न सदावर्ते यांनी पत्र लिहिले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षणाचा आम्हाला आदर आहे. स्वत:ला मराठा म्हणता मग ओबीसींमधून आरक्षण कशाला मागता. परिस्थिती कळाली पाहिजे. तुमच्याच बोलण्यातून ते फेल झाले आहे, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. 

हा समाज सर्वोच्च न्यायालयाने मागास म्हणून नाकारला

अत्याचाराची भाषा केली. पोलिसांना धमकी दिली. आम्ही तक्रार आणि नोटीस रितसर दिली आहे. गुन्हे जे यांनी मागच्यावेळी केले आहेत. बसेस जाळल्या, यांच्याकडून वसुली करण्यात येईल. जो समाज कायम राज्यकर्ता आहे. हा समाज सर्वोच्च न्यायालयाने मागास म्हणून नाकारला आहे. त्यामुळे आरक्षण मागणीवर नाही तर परिस्थितीवर असते, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. काहीतरी मृगजळ दाखवून लोकांना एकत्र आणून गलिच्छ राजकारण केले जात आहे. हे राजकारण शरद पवार हेच करत आहेत. त्यांचाच मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा आहे, असा मोठा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. 

दरम्यान, माझ्या 'एक मराठा लाख मराठा' घोषणेवर टीका त्यांनी केली. पण, ही घोषणा जातीवाचक नाही. ही गोष्ट सैन्यातील आहेत. त्यामुळे ते काहीही बोलत होते. बरगळत होते. मनोज जरांगेंच्या सभांना केवळ एका जत्रेसारखे पाहतो. याठिकाणी लोक येतात आणि मौजमजा करुन निघून जातात. त्याप्रकारे त्याठिकाणी काही वैचारिक घडले नाही. त्यांचे बोलणे मग्रुरी आणि माजोरीपणाचे होते. यावरुन त्यांच्या अकलेची कुवत उघडी पडली आहे, या शब्दांत गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणGunratna Sadavarteगुणरत्न सदावर्ते