शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मूल दत्तक घेणे झाले आता सोपे! जिल्हाधिकारीच देणार आदेश, विलंब टळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 06:37 IST

मूल दत्तक घ्यायचे म्हटले तर महिनोन् महिने चालणारी आणि किचकट असलेली प्रक्रिया पूर्ण करताना दाम्पत्यांच्या नाकीनऊ येतात.

अविनाश साबापुरेयवतमाळ :

मूल दत्तक घ्यायचे म्हटले तर महिनोन् महिने चालणारी आणि किचकट असलेली प्रक्रिया पूर्ण करताना दाम्पत्यांच्या नाकीनऊ येतात. त्यामुळे अनेक जण इच्छा असूनही मूल दत्तक घेत नाहीत किंवा कायदेशीर प्रक्रिया न करता मूल दत्तक घेतात. आता हा विलंब टाळण्यासाठी दत्तक विधानाची प्रक्रिया अतिशय सोपी करण्यात आली आहे. दत्तक प्रक्रियेतील न्यायालयीन विलंब टाळून थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच दत्तक आदेश जारी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. याबाबत केंद्रीय महिला व बालविकास आयुक्तालयाने लेखी निर्देश जारी केले आहेत.

राज्यात दत्तक विधानाच्या प्रलंबित प्रकरणांची संख्या प्रचंड वाढली आहे. न्यायालयातून आदेश येईपर्यंत सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ लागत असल्याने अनेकदा कायदेशीर प्रक्रिया टाळून गुपचूप मूल दत्तक घेण्याचे प्रकार घडतात. त्यातून संबंधित मुलाला दत्तक पालकांच्या संपत्तीमध्ये वाटा मिळण्यात अडचणी येतात. आता मात्र न्यायालयीन प्रकरणांना फाटा देत संबंधित जिल्हाधिकारीच दत्तक आदेश बहाल करणार आहेत. ही प्रक्रिया केवळ एका महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यामुळे न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या दत्तक प्रकरणांशी संबंधित सर्व प्रकरणे जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे हस्तांतरित करण्याचे आदेश आयुक्तालयाने दिले आहेत. पूर्वीची दत्तक प्रक्रिया- ‘कारा’च्या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी  लागत होती. त्यानंतर हे प्रकरण जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडे येत होते. कक्षातर्फे दाम्पत्याच्या कागदपत्रांची तपासणी तसेच त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केल्यावर कागदपत्रे पोर्टलवर अपलोड केली जात होती. - या कागदपत्रांचा ‘कारा’कडून सकारात्मक अहवाल आल्यास प्रकरण न्यायालयाकडे जात होते. सुनावणी झाल्यावर संबंधित मुलाचे कागदपत्रावरील नाव बदलणे, अन्य बदल करणे ही प्रक्रिया पार पाडली जात होती. नवी सोपी प्रक्रियाआता मूल दत्तक घेण्यास इच्छुक दाम्पत्य जिल्हा बाल संरक्षण कक्षात येऊन नोंदणी करतील. त्यासाठी कक्षाचे अधिकारी मदत करतील. कक्षाचे पथक सर्व बाबींची तपासणी करून आपल्या अभिप्रायासह जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करतील. जिल्हाधिकारीच दत्तक आदेश जारी करतील. कागदपत्रे योग्य असतील तर ही प्रक्रिया ६० दिवसात पूर्ण होणार आहे.