शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

५० पुस्तके वाचणाऱ्या विद्यार्थ्यांचे साहित्य संमेलनाध्यक्ष पत्र लिहून करणार कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 03:32 IST

विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी यासाठी १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर दरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी किमान ५० पुस्तके वाचली असतील त्यांना अभिनंदनपर असे छानसे कौतुकाचे पत्र पाठविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

मुंबई : अवांतर वाचन हे निरंतर शिक्षण असते. त्याद्वारे सशक्त वाचन संस्कृती निर्माण होते व अशाच देशात ज्ञानसत्ता निर्माण होत असते. त्यामुळे राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त गोष्टींची तसेच माहितीपर पुस्तके वाचावीत, असे आवाहन नियोजित अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले आहे. विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी यासाठी १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर दरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी किमान ५० पुस्तके वाचली असतील त्यांना अभिनंदनपर असे छानसे कौतुकाचे पत्र पाठविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. यासाठी राज्यातील सर्व प्रकारच्या शाळा आणि सर्व प्रकारच्या माध्यमातील विद्यार्थी पात्र ठरतील.गेले वर्षभर राज्यातील शिक्षक, विद्यार्थ्यांना संमेलनाध्यक्ष उपक्रमासाठी आवाहन करीत आहेत. यामधून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागून त्यांचे अवांतर वाचन वाढण्यास मदत होईल. तिसरी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम असूनडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला याचे आयोजन करण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बालवयापासून वाचनाची आवड होती. वाचन व व्यासंगामुळे ते एवढे मोठे महामानव झाले व त्यांनी भारतीय घटनेची निर्मिती केली. त्यामुळे त्यांच्या स्मृतीला विद्यार्थ्यांनी वंदन करून वाचनाची आवड स्वत:ला लावून घ्यावी, असे आवाहन देशमुख यांनी विद्यार्थ्यांना केले आहे. तसेच शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना यासाठी प्रोत्साहित करावे आणि अशा विद्यार्थ्यांची माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी शाळांनाही केले आहे.‘त्या’ विद्यार्थ्यांना देणार आणखी ५ पुस्तकेसर्वाधिक पुस्तके वाचणाºया १० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. संमेलनाध्यक्ष त्यांना आणखी प्रत्येकी ५ पुस्तके भेट देतील. वाचनातून सक्षम पिढी घडविण्यासाठी या उपक्रमाचा हातभार लागेल, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Studentविद्यार्थी