शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

५० पुस्तके वाचणाऱ्या विद्यार्थ्यांचे साहित्य संमेलनाध्यक्ष पत्र लिहून करणार कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 03:32 IST

विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी यासाठी १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर दरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी किमान ५० पुस्तके वाचली असतील त्यांना अभिनंदनपर असे छानसे कौतुकाचे पत्र पाठविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

मुंबई : अवांतर वाचन हे निरंतर शिक्षण असते. त्याद्वारे सशक्त वाचन संस्कृती निर्माण होते व अशाच देशात ज्ञानसत्ता निर्माण होत असते. त्यामुळे राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त गोष्टींची तसेच माहितीपर पुस्तके वाचावीत, असे आवाहन नियोजित अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले आहे. विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी यासाठी १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर दरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी किमान ५० पुस्तके वाचली असतील त्यांना अभिनंदनपर असे छानसे कौतुकाचे पत्र पाठविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. यासाठी राज्यातील सर्व प्रकारच्या शाळा आणि सर्व प्रकारच्या माध्यमातील विद्यार्थी पात्र ठरतील.गेले वर्षभर राज्यातील शिक्षक, विद्यार्थ्यांना संमेलनाध्यक्ष उपक्रमासाठी आवाहन करीत आहेत. यामधून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागून त्यांचे अवांतर वाचन वाढण्यास मदत होईल. तिसरी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम असूनडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला याचे आयोजन करण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बालवयापासून वाचनाची आवड होती. वाचन व व्यासंगामुळे ते एवढे मोठे महामानव झाले व त्यांनी भारतीय घटनेची निर्मिती केली. त्यामुळे त्यांच्या स्मृतीला विद्यार्थ्यांनी वंदन करून वाचनाची आवड स्वत:ला लावून घ्यावी, असे आवाहन देशमुख यांनी विद्यार्थ्यांना केले आहे. तसेच शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना यासाठी प्रोत्साहित करावे आणि अशा विद्यार्थ्यांची माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी शाळांनाही केले आहे.‘त्या’ विद्यार्थ्यांना देणार आणखी ५ पुस्तकेसर्वाधिक पुस्तके वाचणाºया १० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. संमेलनाध्यक्ष त्यांना आणखी प्रत्येकी ५ पुस्तके भेट देतील. वाचनातून सक्षम पिढी घडविण्यासाठी या उपक्रमाचा हातभार लागेल, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Studentविद्यार्थी