शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

आदिवासींनी कायद्याचे प्राथमिक ज्ञान घेणं गरजेचे- न्यायधीश ए.एस.अत्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 17:53 IST

अंबरनाथ : शेतजमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये सर्वाधिक फसवणूक ही आदिवासी बांधवांची होत असते. अज्ञानाचा फायदा घेणारे असंख्य आहेत. त्यामुळे आता ...

अंबरनाथ : शेतजमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये सर्वाधिक फसवणूक ही आदिवासी बांधवांची होत असते. अज्ञानाचा फायदा घेणारे असंख्य आहेत. त्यामुळे आता काळानुरुप आदिवासींनीदेखील शिक्षणासोबत कायद्याचे किमान प्राथमिक ज्ञान घेणे गरजेचे आहे. आदिवासीयांपर्यंत कायद्याचे ज्ञान पोहोचविण्यासाठीच असे शिबिरे घेण्यात येत असल्याचे मत उल्हासनगर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए.एस.अत्रे  यांनी व्यक्त केले. 

अंबरनाथ पंचायत समिती आणि अंबरनाथ तहलिसदार कार्यालयामार्फत कातकरी उत्थान योजनेंतर्गत आदिवासी बांधवांना दाखले वाटप करण्यात आले. याच कार्यक्रमात आदिवासी बांधव, महिला बचतगट यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अत्रे उपस्थित होते.  यावेळी त्यांनी सांगितले की, शासकीय योजना आदिवासीयांपर्यंत पोहोचत नाही अशी ओरड असते. मात्र आता काळानुरुप आदिवासीयांनी देखील आपल्या हक्कासाठी पुढे सरसावले पाहिजे. आदिवासीयांनी सर्वाधिक फसवणूक आपल्याडे होत आहे. त्यामुळे आता आदिवासीयांनी देखील कायद्याचे प्राथमिक ज्ञान घेणे गरजेचे आहे. कायद्याचे सर्व ज्ञान घेणो सोपे नसले तरी किमान आपल्या हक्कासंदर्भातील ज्ञान संकलीत करण्याची गरज आहे. हेच ज्ञान देण्याचा प्रयत्न आम्ही अशा शिबिराच्या माध्यमातून करित असल्याचे त्यांनी सांगितले. कायद्यांसदर्भात माहिती देण्यासाठी मोफत सल्ला केंद्र न्यायालयात उभारण्यात आले आहे. कोणत्याही कायद्याच्या संदर्भातील माहिती कोणतीही व्यक्त या केंद्रातून घेऊ शकते. जास्तीत जास्त लोकांनी या सेवेचा लाभ घेणे गरजेचे आहे. न्यायालयात जी अनेक फसवणुकीची प्रकरणे समोर येतात त्यात अज्ञानाचा फायदा घेऊन फसवणूक झालेले अनेक प्रकरणे पुढे आली आहेत. ती प्रकरणे कोठेतरी थांबणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी तहसिलदार प्रशांत जोशी यांनी आदिवासीयांना त्यांच्या हक्काशी निगडीत कायद्यांची माहिती दिली. सातबारा उता-यांसदर्भात आणि शेतीशी निगडीत आदिवासीयांचे हक्क आणि वनविभागाची निगडीत आदिवासीयांचे हक्क या संदर्भात जोशी यांनी मार्गदर्शन केले.

वन जमिनीमधील आदिवासीयांना दिलेले अधिकारांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. तर अॅड. साधना निंबाळकर यांनी शेतक-यांच्या शेतजमिनीसंदर्भात माहिती दिली. अनेक आदिवासीयांना त्यांच्या शेतजमिनीच्या हक्कांचीच माहिती नसते. त्यासाठी काय करावे या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. आदिवासीयांच्या जागेची खरेदी आणि विक्रीतील नियमांची माहिती यावेळी करुन देण्यात आली. सोबत महिला अत्याचारासंदर्भात देखील मार्गदर्शन केले.  अॅड. अभय जोगळेकर यांनी शेतक-यांना सातबा-यांविषयी माहिती दिली. गटविकास अधिकारी शितल कदम यांनी महिलांना शासनाच्या योजनांची माहिती दिली. अंबरनाथ पंचायत समितीच्या सभापती स्वप्नाली भोईर यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसभापती सुरेश पाटील, बाळाराम कांबरी, अंबरनाथच्या नगराध्यक्ष मनिषा वाळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.