शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

शरद पवारांच्या तालमीत तयार होण्याची आदित्य ठाकरेंना संधी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 13:50 IST

पवार राज्याच्या राजकारणात सहभागी झालेच तर याचा सर्वाधिक फायदा आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांना होऊ शकतो. त्याचे कारण म्हणजे दोघांना सभागृहाचे कामकाज आणि पवारांच्या अनुभवाचा आपल्या राजकीय भवितव्यासाठी फायदा होऊ शकतो.  

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात सबकुछ शरद पवारच हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. शरद पवारांचा काळ संपला आता माझा काळ सुरू झाला म्हणणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निकालाच्या आठ दिवसानंतरही सत्ता स्थापनेसाठी दिल्लीच्या वाऱ्या करत आहेत. त्यातच शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र येत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यामुळे शिवसेना आणि शरद पवार यांची जवळीक वाढत आहे. याचा शिवसेनेला फायदाच होईल अशी सध्याची स्थिती आहे.

आदित्य ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू तर शरद पवार आणि बाळासाहेब हे चांगले मित्र होते. आता या मैत्रीला उद्धव ठाकरे वेगळ्या उंचीवर नेणार की, पुन्हा भाजपसोबत घरोबा करणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. मात्र यावेळी ठाकरे कुटुंबातील व्यक्ती निवडणूक लढवून सभागृहात दाखल झाली आहे. आदित्य ठाकरे यांनी वरळीतून निवडणूक लढवली असून ते आमदार झाले आहेत. 

दरम्यान शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून वाद सुरू झाला आहे. शिवसेना 50-50 च्या फॉर्म्युल्यावर अडून बसली आहे. तर भाजप मुख्यमंत्रीपद आणि काही महत्त्वाची पदे आपल्याकडेच ठेवण्यावर ठाम आहे. अशा स्थितीत शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरू आहे. तर काँग्रेसने पवार मुख्यमंत्री होणार असतील तर आपला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्याकडे येऊ शकते. 

यात काही तथ्य नसलं तरी असं झाल्यास, आदित्य ठाकरे यांना शरद पवारांच्या तालमीत तयार होण्याची संधी मिळणार आहे. पवारांनी आधीच आपला नातू रोहित पवार यांना विधानसभेत पाठवले आहे. त्याचवेळी आदित्यही सभागृहात दाखल झाले आहे. जर पवार राज्याच्या राजकारणात सहभागी झालेच तर याचा सर्वाधिक फायदा आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांना होऊ शकतो. त्याचे कारण म्हणजे दोघांना सभागृहाचे कामकाज आणि पवारांच्या अनुभवाचा आपल्या राजकीय भवितव्यासाठी फायदा होऊ शकतो.