शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

एकनाथ शिंदेंवर टीका तर देवेंद्र फडणवीसांबाबत सहानुभूती; आदित्य ठाकरे कडाडले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 15:14 IST

'पंतप्रधान नरेंद्र मोदींशी आमचे वैर नाही, आम्ही त्यांचा आदर करतो.'

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेते सातत्याने शिंदे गटातील नेत्यांवर टीका करताना दिसत आहेत. यातच, शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना देशद्रोही म्हटले. इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात ते बोलत होते.

'आमच्या काळात 6 लाख कोटींची गुंतवणूक आली'या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एकदाही निशाणा साधला नाही. मोदींचे आणि उद्धवजी ठाकरेंचे चांगले संबंध असल्याचे आदित्य म्हणाले. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असताना केंद्र सरकारशी चांगला समन्वय होता, असेही आदित्य म्हणाले. दरम्यान, 'महाराष्ट्राच्या हातातून अनेक प्रकल्प निघून गेले. राज्यात असंवैधानिक सरकार आल्यापासून कोणीही गुंतवणूक करू इच्छित नाही. या लोकांना केंद्राशी योग्य समन्वय साधता येत नाही. आम्ही सरकारमध्ये असताना केंद्राने 6 लाख कोटींहून अधिक गुंतवणूक केली,' अशी टीका आदित्य ठाकरे यांनी विद्यमान सरकारवर केली.

'आम्ही नेहमीच PM मोदींचा आदर केलाय'यानंतर आदित्य यांना जेव्हा विचारण्यात आले की, 2021 मध्ये उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट घेतली होती. ते भाजपसोबत जाऊ शकतात, असे त्यांच्याकडून तेव्हा सूचित करण्यात आले होते. त्यावर आदित्य म्हणाले की, 'पंतप्रधानांशी कोणाचेही वैर नाही. प्रत्येक घटनेला राजकारणाशी जोडता येत नाही. उद्धवजी दिल्लीला गेले आणि पंतप्रधान मोदींशी संवाद साधला. ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून भेटले होते. लोकांच्या समस्या होत्या, काही अपेक्षा होत्या, त्या पूर्ण करण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेतली होती. आमच्याकडून पंतप्रधानांबद्दल कधीही अपशब्द बोलले गेले नाहीत, आम्ही त्यांचा आदर करतो,' असे आदित्य म्हणाले.

'...तर फडणवीस मुख्यमंत्री असते'या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही मोठे वक्तव्य केले. 'आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम केले आहे, ते खूप अनुभवी नेते आहेत. ते या सरकारमध्ये सामील झाले, हे पाहून आश्चर्य वाटते. देवेंद्र फडणवीसांची निंदा होते, ट्रोल केले जाते, हे पाहून वाईट वाटते. आज भाजप आमच्यासोबत असते, तर देवेंद्र फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री झाले असते. आमच्यात निवडणुकीपूर्वी करार झाला होता. पण, कदाचित त्यांच्या मनात काहीतरी वेगळेच असेल,' असेही आदित्य म्हणाले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस