शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

एकनाथ शिंदेंवर टीका तर देवेंद्र फडणवीसांबाबत सहानुभूती; आदित्य ठाकरे कडाडले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 15:14 IST

'पंतप्रधान नरेंद्र मोदींशी आमचे वैर नाही, आम्ही त्यांचा आदर करतो.'

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेते सातत्याने शिंदे गटातील नेत्यांवर टीका करताना दिसत आहेत. यातच, शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना देशद्रोही म्हटले. इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात ते बोलत होते.

'आमच्या काळात 6 लाख कोटींची गुंतवणूक आली'या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एकदाही निशाणा साधला नाही. मोदींचे आणि उद्धवजी ठाकरेंचे चांगले संबंध असल्याचे आदित्य म्हणाले. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असताना केंद्र सरकारशी चांगला समन्वय होता, असेही आदित्य म्हणाले. दरम्यान, 'महाराष्ट्राच्या हातातून अनेक प्रकल्प निघून गेले. राज्यात असंवैधानिक सरकार आल्यापासून कोणीही गुंतवणूक करू इच्छित नाही. या लोकांना केंद्राशी योग्य समन्वय साधता येत नाही. आम्ही सरकारमध्ये असताना केंद्राने 6 लाख कोटींहून अधिक गुंतवणूक केली,' अशी टीका आदित्य ठाकरे यांनी विद्यमान सरकारवर केली.

'आम्ही नेहमीच PM मोदींचा आदर केलाय'यानंतर आदित्य यांना जेव्हा विचारण्यात आले की, 2021 मध्ये उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट घेतली होती. ते भाजपसोबत जाऊ शकतात, असे त्यांच्याकडून तेव्हा सूचित करण्यात आले होते. त्यावर आदित्य म्हणाले की, 'पंतप्रधानांशी कोणाचेही वैर नाही. प्रत्येक घटनेला राजकारणाशी जोडता येत नाही. उद्धवजी दिल्लीला गेले आणि पंतप्रधान मोदींशी संवाद साधला. ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून भेटले होते. लोकांच्या समस्या होत्या, काही अपेक्षा होत्या, त्या पूर्ण करण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेतली होती. आमच्याकडून पंतप्रधानांबद्दल कधीही अपशब्द बोलले गेले नाहीत, आम्ही त्यांचा आदर करतो,' असे आदित्य म्हणाले.

'...तर फडणवीस मुख्यमंत्री असते'या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही मोठे वक्तव्य केले. 'आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम केले आहे, ते खूप अनुभवी नेते आहेत. ते या सरकारमध्ये सामील झाले, हे पाहून आश्चर्य वाटते. देवेंद्र फडणवीसांची निंदा होते, ट्रोल केले जाते, हे पाहून वाईट वाटते. आज भाजप आमच्यासोबत असते, तर देवेंद्र फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री झाले असते. आमच्यात निवडणुकीपूर्वी करार झाला होता. पण, कदाचित त्यांच्या मनात काहीतरी वेगळेच असेल,' असेही आदित्य म्हणाले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस