शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचा पेच आदित्य यांच्या समावेशाने टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 22:45 IST

नाराजीचा सूर; आता नगरविकास खात्यावरून रस्सीखेच

ठाणे : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारल्याने राज्यातील सत्तेत पहिल्या क्रमांकाचा पेच मिटला होता. मात्र उद्धव यांच्यानंतर दुसºया क्रमांकावर कोण यावरुन शिवसेना नेते सुभाष देसाई व एकनाथ शिंदे यांच्यात सुरु असलेली रस्सीखेच आदित्य ठाकरे यांचा अगदी ऐनवेळी कॅबिनेटमंत्री म्हणून राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्याचा निर्णय घेऊन सोडवण्यात आला. आता सेनेकडे असलेले सर्वात महत्त्वाचे नगरविकास खाते कुणाकडे राहणार, यावरुन स्पर्धा लागली आहे. त्यामुळे हे खाते ठाकरे पिता-पुत्र स्वत:कडे ठेवणार का, अशी चर्चा सुरु आहे.राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन करण्याचा निर्णय झाला तेव्हा या सरकारचे नेतृत्व कोण करणार, या विषयाभोवती चर्चा फिरत होती. ज्येष्ठतेच्या निकषानुसार सुभाष देसाई यांचे नाव घेतले जात होते तर संघटनात्मकदृष्ट्या सक्षम व पक्षाला रसद पुरवणारा नेता या निकषावर एकनाथ शिंदे हेच दावेदार होते. उद्धव ठाकरे यांनीच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री व्हावे, असा आग्रह मित्रपक्षाच्या काही नेत्यांनी धरल्याने पहिल्या क्रमांकाचा वाद संपुष्टात आला.राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करताना आता मुख्यमंत्र्यांनंतर कोण? या वादाने डोके वर काढले होते. दुसºया क्रमांकावरील नेतृत्व करणारी व्यक्ती ही ‘शॅडो चीफ मिनिस्टर’ असेल, अशी दोन्ही दावेदारांची भावना होती. सेनेत दुसºया क्रमांकावरुन संघर्ष होईल, अशी चिन्हे दिसताच सेनेतील काही वरिष्ठ नेते व ठाकरे कुटुंबातील काही व्यक्तींनी अगदी ऐनवेळी आदित्य यांचा मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्री म्हणून समावेश करण्याचा आग्रह धरला व तोच हा वाद रोखण्याचा मार्ग असल्याने स्वीकारला गेला.साहजिकच दुसºया क्रमांकाचे दावेदार असलेले नेते हिरमुसले आहेत. आता नगरविकास खात्यावरुन सेनेत चुरस निर्माण झाली आहे. देसाई यांनी नगरविकास खात्याकरिता आग्रह धरला असून शिंदे हेही याच खात्याची जबाबदारी मिळावी, असे स्वप्न पाहत आहेत. त्यामुळे आता नगरविकास खाते कुणाकडे जाणार, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.नगरविकास मुख्यमंत्र्यांकडे?खात्यावरुन होणारा वाद टाळायचा असल्यास नगरविकास उद्धव हे स्वत:कडे ठेवतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. तसे झाले तर राज्यातील सरकारचे नेतृत्व करण्याची मनिषा बाळगणाºया सेनेतील नेत्यांवर किरकोळ खात्यांवर समाधान मानण्याची वेळ येईल, अशी चर्चा आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे