शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अदिती तटकरेंची पालकमंत्रीपदी केलेली निवड शिवसेनेसाठी ठरतेय डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 13:05 IST

आधीच मंत्रीपदांवरून अनेक नेत्यांमध्ये नाराजी आहे. अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर करण्यात यश आले असले तरी तानाजी सावंत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच आता रायगड जिल्ह्यातील शिवसैनिक आणि लोकप्रतिनिधी आक्रमक झाल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. 

मुंबई - महाविकास आघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप झालं आहे. त्यापाठोपाठ पालकमंत्र्यांच्या देखील नियुक्त्या झाल्या आहेत. आधी मंत्रीपदावरून व्यक्त होणार नाराजी आता पालकमंत्रीपदावरूनही वाढत आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून शिवसैनिक नाराज असल्यामुळे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढली आहे. 

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून जिल्ह्यातील शिवसेनेत नाराजी आहे. महाविकास आघाडीत रायगडचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे गेले आहे. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या कन्या राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक जिंकून सभागृहात दाखल झालेल्या अदिती यांना राज्यमंत्रीपदापाठोपाठ जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. मात्र यामुळे शिवसैनिक नाराज झाले आहेत. 

मागील दोन ते तीन दिवसांपासून पालकमंत्रीपदावरून शिवसैनिक आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवत आहे. तर अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याची तयारी दर्शविली आहे. रायगड जिल्ह्यावर शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे अशी शिवसैनिकांची भावना आहे. अन्यथा पदाधिकारी, शिवसैनिक आणि लोकप्रतिनीधी राजीनाम्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

आधीच मंत्रीपदांवरून अनेक नेत्यांमध्ये नाराजी आहे. अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर करण्यात यश आले असले तरी तानाजी सावंत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच आता रायगड जिल्ह्यातील शिवसैनिक आणि लोकप्रतिनिधी आक्रमक झाल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे.