शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयात येणाऱ्या शिक्षकांवर कारवाई

By admin | Updated: July 11, 2017 00:39 IST

ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांची वैयक्तिक कामे ही आपल्या तालुका पातळीवर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी करावी.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांची वैयक्तिक कामे ही आपल्या तालुका पातळीवर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी करावी. या कामांसाठी कोणताही शिक्षक यापुढे पंचायत समिती अािण जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात येणार नाही. जर कोणताही शिक्षक शाळेच्या वेळेत पंचायत समिती अथवा जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात आला, तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती विवेक वळसे-पाटील यांनी दिला आहे. अनेक शिक्षक हे शाळेच्या वेळेत पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात येतात, अशा तक्रारी समितीच्या अनेक सदस्यांनी या बैठकीत केल्या. गावोगावचे अनेक शिक्षक हे स्थानिक पातळीवर राजकारणात सक्रिय आहेत, ते विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम सोडून बऱ्याच वेळा पदाधिकाऱ्यांच्या पुढे पुढे करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे त्यांचे दुर्लक्ष होते़ सध्या जिल्हा परिषदेच्या शाळांपुढे खासगी शाळांचे आव्हान उभे आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष द्यावे, त्यांनी मुख्यालयात येऊ नये, असे वळसे पाटील यांनी सांगितले़>विविध विषयांवर रंगली सभासदांची चर्चा जिल्हा परिषदेच्या सभागृहात शिक्षण समितीची बैठक सोमवारी पार पडली. या वेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे गणवेश, पाठ्यपुस्तके, शिक्षकांच्या रिक्त जागा, शालेय पोषण आहार, शैक्षणिक गुणवत्ता अभियान, वरिष्ठ वेतनश्रेणी, वैद्यकीय बिले या विषयांवर चर्चा केली़ जिल्ह्यात ५१२ शिक्षक आठवडाभरात रुजू होणारजिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ९२३ जागा रिक्तआहेत़ आंतरजिल्ह्यातून ५१२ शिक्षक रुजू होणार आहेत़ पुणे जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात ८२ शिक्षण बाहेर गेले आहेत़ त्यामुळे रिक्त जागा राहण्याचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागणार आहे़ तरीही चारशे जागांच्या आसपास या जागा रिक्त राहतील़ जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा डिजिटल करण्याचा मानस असून, याबाबत येत्या महिनाभरात निर्णय घेतला जाणार असल्याचेही उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांनी याप्रसंगी सांगितले़दोन-तीन शाळांचे एकत्रिकरण करून समायोजन करणारशिक्षण समितीच्या सदस्यांनी आपापल्या मतदार संघात असलेल्या समस्या मांडल्या. विविध शैक्षणिक योजनांवर चर्चा करण्यात आली़ शालेय पोषणआहार आणि गणवेश वाटप या योजना प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन, वळसे पाटील यांनी केले़ तसेच, एकाच परिसरात सुरू असलेल्या दोन-तीन शाळांचे एकत्रीकरण करून समायोजन करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवावा, अशा सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांना करण्यात आल्या़ शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी कालबद्ध कार्यक्रम तयार करून त्याचा आढावा घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले़