शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हॉर्नचा ‘आवाज दाबा’; वाहननिर्मात्यांना आवाहन, भाेंग्यांवरून मुंबई पोलिसांचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 06:02 IST

पोलिसांनी ऑटोमोबाईल उत्पादकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वाहनांच्या हॉर्नची आवाज मर्यादा कमी करण्याची विनंती केली आहे.

मुंबई : धार्मिक स्थळांवरील  ध्वनिक्षेपकाच्या वापरावरून वाद सुरू असताना, मुंबई पोलिसांनी ध्वनी प्रदूषणावर  नियंत्रण आणण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. तसेच, ऑटोमोबाईल उत्पादकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वाहनांच्या हॉर्नची आवाज मर्यादा कमी करण्याची विनंती केली आहे.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वाहनांच्या हॉर्नचा आवाज ९२ ते ११२ डेसिबलच्या श्रेणीत आहे, जो सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत आहे. यासंदर्भात विविध ऑटोमोबाईल उत्पादकांसोबत बैठक घेत त्यांना,  ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी वाहनांच्या हॉर्नचा आवाज कमी करण्यास सांगितल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मुंबई पोलिसांनी यापूर्वी विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे.

यासोबतच सण, उत्सवाच्या काळात जोरजोरात ढोल वाजवणे व डॉल्बी साऊंड सिस्टीमवरून मोठ्या आवाजात गाणी, फटाके वाजवणे यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत असते. ध्वनिप्रदूषणामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होत असतो. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई पोलिसांकडून  प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये ध्वनिप्रदूषणासंदर्भात एका विशेष पोलीस निरीक्षकाची नेमणूक केलेली आहे. 

संबंधित अधिकाऱ्याकडे थेट ध्वनिप्रदूषणाबाबत तक्रार करता येणार आहे. यामध्ये तक्रारदाराची ओळख उघड होणार नाही, याबाबत पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. ...तर ७ वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूदnसर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण संरक्षणाचा कायदा सन १९८६  व ध्वनिप्रदूषण अधिनियम २००० मधील तरतुदींचे सक्त पालन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार रात्री १०  वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत लाऊड स्पीकर, फटाके, वाद्ये वाजविण्यास सक्त बंदी केलेली आहे. 

  • सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १०  वाजल्यापर्यंतसुद्धा लाऊड स्पीकर, फटाके, वाद्ये आदींवर मर्यादा ठेवण्यात आल्या आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास ध्वनिप्रदूषणासाठी ५  वर्षे कैदेची किंवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. 
  • शिक्षा होऊनही गुन्हे सुरू राहिल्यास पुढील प्रत्येक दिवसाला पाच हजार रुपये दंडाची तरतूद आहे.
  • कलम  १५  (१) प्रमाणे शिक्षा होऊन एका वर्षात पुन्हा असे गुन्हे केल्यास ७ वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. याबाबतही पोलिसांकडून जनजागृती करण्यात येत आहे.

कुठे किती, आवाजाची मर्यादा? (डेसिबलमध्ये)

         विभाग     दिवसा      रात्री औद्योगिक क्षेत्र      ७५          ७० विपणन क्षेत्र         ६५          ५५ रहिवासी क्षेत्र        ५५          ४५ शांतता विभाग       ५०          ४०  

टॅग्स :MumbaiमुंबईSupreme Courtसर्वोच्च न्यायालय