शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

देशात शेतकरी आंदोलनाची दिशा अकोल्यातून ठरणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 04:32 IST

कृषिप्रधान देशात शेतक-यांनाच शासनाविरुद्ध झगडावे लागत आहे. शेतक-यांची सहनशीलता संपली आहे. त्यामुळे देशातील शेतकरी

अकोला : कृषिप्रधान देशात शेतक-यांनाच शासनाविरुद्ध झगडावे लागत आहे. शेतक-यांची सहनशीलता संपली आहे. त्यामुळे देशातील शेतकरी आंदोलनाची दिशा आता अकोल्यात सोमवारपासून सुरू होणा-या आंदोलनाने ठरणार आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय अर्थमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी येथे केले.शेतकरी जागर मंचच्यावतीने रविवारी येथे स्वराज्य भवनात कापूस, सोयाबीन, धान (कासोधा) परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जगदिश मुरूमकार पाटील होते. सिन्हा म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या सरकारला सत्तेवर येऊन साडेतीन वर्ष पूर्ण होत आले, तरी शेतकºयांवरील अन्याय दूर झालेला नाही. उलट शेतकरी आणखी अडचणीत सापडले आहेत. शेतमालाला भाव मिळण्यासाठी लढावे लागत आहे. जात, धर्म बाजूला ठेवून आता एकदिलाने, एकजुटीने ‘शेतकरी’ हीच जात आणि धर्म मानून शासनविरोधात लढाईसाठी सज्ज व्हावे. सोमवारपासून शेतकºयांसाठी अकोल्यातून आंदोलन सुरू होईल. हे आंदोलन देशभरातील शेतकºयांना दिशा देणारे असेल.मला आता कोणतेही राजकारण करायचे नाही किंवा अकोल्यातून मला लोकसभेची निवडणुकही लढवायची नाही. शेतकºयांसाठी जीवन अर्पण करण्याचे ठरविले असून त्यांच्यासाठी आता छातीवर वार झेलावे लागले तरी मागे हटणार नाही. शेतकºयांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही. देशभरातील शेतकºयांना आरसा दाखविण्याचे काम अकोल्यातून करायचे आहे, असेही सिन्हा यांनी स्पष्ट केले. माजी आ. शंकरअण्णा धोंडगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाFarmerशेतकरी