शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

देशात शेतकरी आंदोलनाची दिशा अकोल्यातून ठरणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 04:32 IST

कृषिप्रधान देशात शेतक-यांनाच शासनाविरुद्ध झगडावे लागत आहे. शेतक-यांची सहनशीलता संपली आहे. त्यामुळे देशातील शेतकरी

अकोला : कृषिप्रधान देशात शेतक-यांनाच शासनाविरुद्ध झगडावे लागत आहे. शेतक-यांची सहनशीलता संपली आहे. त्यामुळे देशातील शेतकरी आंदोलनाची दिशा आता अकोल्यात सोमवारपासून सुरू होणा-या आंदोलनाने ठरणार आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय अर्थमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी येथे केले.शेतकरी जागर मंचच्यावतीने रविवारी येथे स्वराज्य भवनात कापूस, सोयाबीन, धान (कासोधा) परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जगदिश मुरूमकार पाटील होते. सिन्हा म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या सरकारला सत्तेवर येऊन साडेतीन वर्ष पूर्ण होत आले, तरी शेतकºयांवरील अन्याय दूर झालेला नाही. उलट शेतकरी आणखी अडचणीत सापडले आहेत. शेतमालाला भाव मिळण्यासाठी लढावे लागत आहे. जात, धर्म बाजूला ठेवून आता एकदिलाने, एकजुटीने ‘शेतकरी’ हीच जात आणि धर्म मानून शासनविरोधात लढाईसाठी सज्ज व्हावे. सोमवारपासून शेतकºयांसाठी अकोल्यातून आंदोलन सुरू होईल. हे आंदोलन देशभरातील शेतकºयांना दिशा देणारे असेल.मला आता कोणतेही राजकारण करायचे नाही किंवा अकोल्यातून मला लोकसभेची निवडणुकही लढवायची नाही. शेतकºयांसाठी जीवन अर्पण करण्याचे ठरविले असून त्यांच्यासाठी आता छातीवर वार झेलावे लागले तरी मागे हटणार नाही. शेतकºयांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही. देशभरातील शेतकºयांना आरसा दाखविण्याचे काम अकोल्यातून करायचे आहे, असेही सिन्हा यांनी स्पष्ट केले. माजी आ. शंकरअण्णा धोंडगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाFarmerशेतकरी