शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

देशात शेतकरी आंदोलनाची दिशा अकोल्यातून ठरणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 04:32 IST

कृषिप्रधान देशात शेतक-यांनाच शासनाविरुद्ध झगडावे लागत आहे. शेतक-यांची सहनशीलता संपली आहे. त्यामुळे देशातील शेतकरी

अकोला : कृषिप्रधान देशात शेतक-यांनाच शासनाविरुद्ध झगडावे लागत आहे. शेतक-यांची सहनशीलता संपली आहे. त्यामुळे देशातील शेतकरी आंदोलनाची दिशा आता अकोल्यात सोमवारपासून सुरू होणा-या आंदोलनाने ठरणार आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय अर्थमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी येथे केले.शेतकरी जागर मंचच्यावतीने रविवारी येथे स्वराज्य भवनात कापूस, सोयाबीन, धान (कासोधा) परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जगदिश मुरूमकार पाटील होते. सिन्हा म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या सरकारला सत्तेवर येऊन साडेतीन वर्ष पूर्ण होत आले, तरी शेतकºयांवरील अन्याय दूर झालेला नाही. उलट शेतकरी आणखी अडचणीत सापडले आहेत. शेतमालाला भाव मिळण्यासाठी लढावे लागत आहे. जात, धर्म बाजूला ठेवून आता एकदिलाने, एकजुटीने ‘शेतकरी’ हीच जात आणि धर्म मानून शासनविरोधात लढाईसाठी सज्ज व्हावे. सोमवारपासून शेतकºयांसाठी अकोल्यातून आंदोलन सुरू होईल. हे आंदोलन देशभरातील शेतकºयांना दिशा देणारे असेल.मला आता कोणतेही राजकारण करायचे नाही किंवा अकोल्यातून मला लोकसभेची निवडणुकही लढवायची नाही. शेतकºयांसाठी जीवन अर्पण करण्याचे ठरविले असून त्यांच्यासाठी आता छातीवर वार झेलावे लागले तरी मागे हटणार नाही. शेतकºयांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही. देशभरातील शेतकºयांना आरसा दाखविण्याचे काम अकोल्यातून करायचे आहे, असेही सिन्हा यांनी स्पष्ट केले. माजी आ. शंकरअण्णा धोंडगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाFarmerशेतकरी