शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

अचलपुर मतदारसंघाच्या निर्मितीपासून निम्मा कालावधी अपक्षांनी गाजवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 12:24 IST

अचलपूर व चांदूर बाजार असे दोन तालुके असलेला हा मतदारसंघ आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे सर्वच मतदारसंघातील इच्छुकांच्या तयारीचा वेग वाढला आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपुर मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र या मतदारसंघाच्या निर्मितीपासून निम्मा कालावधी अचलपुरात अपक्ष उमेदवारांनी नेतृत्व केलं असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळेचं राजकीय पक्षांनी यावेळी अचलपुरात कंबर कसली असल्याचे दिसत आहे.

अचलपूर व चांदूर बाजार असे दोन तालुके असलेला हा मतदारसंघ आहे. स्वतंत्र राज्याच्या निर्मितीनंतर आतापर्यंत या मतदारसंघात १२ विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत ६ वेळा मतदारांनी अपक्ष उमेदवारांना संधी दिली असल्याचे दिसून आले. तर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे आमदार बच्चू कडू हे सलग तीन वेळेपासून या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत.

अचलपूर मतदारसंघात १९६२ मध्ये पहिल्यांदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले माजी आमदार आमसाहेब वाटेणे यांना मतदारांनी संधी दिली होती. त्यावेळी त्यांना ३० हजार १८४ मते मिळाली होती. तर त्यांच्याविरुद्ध मैदानात असलेले काँग्रेसचे कृष्णराव देशमुख यांचा २ हजार १२८ मतांनी पराभव झाला होता. त्यांनतर आजपर्यंत अनेकदा या मतदारसंघाने अपक्ष उमेदवाराला नेतृत्व करण्याची संधी दिली आहे.

अचलपूर मतदारसंघात आजपर्यंत अपक्ष वेतिरिक्त तीन वेळा काँग्रेस,दोन वेळा भाजप व एकदा कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र मतदारसंघाचा इतिहास पहिला तर, मतदारांचा अपक्षांवरच अधिक विश्वास असल्याने विविध राजकीय पक्ष जनतेच्या पसंतीस खरे उतरले नसल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत 'या' मतदारसंघातील मतदार अपक्ष उमेदवाराला निवडणून देण्याचा इतिहास कायम ठेवणार किंवा बदल घडवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.