शहरं
Join us  
Trending Stories
1
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
2
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
3
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
4
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
5
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
6
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
7
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
8
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
9
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
10
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
11
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
12
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
13
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
14
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
15
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
16
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
17
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
18
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
19
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
20
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Daily Top 2Weekly Top 5

१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 12:59 IST

या निर्णयाला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ. मालेगावच्या लोकांना न्याय नक्की मिळेल. आज कोर्टाने न्याय दिला नाही. आम्ही न्यायाची लढाई लढत आहोत अशी प्रतिक्रिया मालेगाव स्फोटातील पीडित कुटुंबाने दिला आहे. 

मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी १७ वर्षांनी कोर्टाने निकाल सुनावला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. यावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. जर आरोपी निर्दोष असतील तर दोषी कुठे आहेत? या निकालामुळे न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहतात अशा भावना व्यक्त करण्यात येत आहे. कोर्टाने दिलेल्या निकालावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी भाष्य केले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पहिली गोष्ट म्हणजे बॉम्बस्फोट झाला का, तर झाला. त्याचे ठिकाणही आहे. या स्फोटात लोकांचाही मृत्यू झाला. जर बॉम्बस्फोट झाला तर त्यातील आरोपी गेले कुठे या स्वाभाविक प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे. जे दोषी असतील त्यांना पकडले जाणे, त्यांना शिक्षा होणे या दृष्टीने सरकार पुढे काय करणार हा प्रश्न आहे. शहीद हेमंत करकरे यांच्यासारखा अधिकारी ज्यांना २६/११ ला देशावर झालेल्या हल्ल्यात वीरमरण आले. त्यांनी या प्रकरणाचे धागेदोरे शोधले होते. त्याचे पुढे काय झाले. त्यामुळे आता सरकारची जबाबदारी आहे स्फोटातील आरोपींना शोधले पाहिजे असं त्यांनी सांगितले. 

तर हेमंत करकरे हे देशातील चांगल्या अधिकाऱ्यांपैकी एक होते. त्यांनी हे प्रकरण काढले. या स्फोटानंतर हिंदू दहशतवाद हा शब्द पुढे आला. सामाजिक ध्रुवीकरण करण्यासाठी हा स्फोट घडवून आणला होता. मग या स्फोटामागे कोण होते? एका साध्वीला अटक केली जाते. देशातील लष्कर अधिकाऱ्याला अटक केली जाते. त्यामुळे देशाच्या न्यायव्यवस्थेवर, लष्करावर त्यावेळी प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. या खटल्याचा राजकीय फायदा घेण्याचं काम भाजपाने केले होते. प्रज्ञा सिंहला भोपाळसारख्या मतदारसंघात खासदार बनवले होते. जेव्हा आर.आर पाटील राज्याचे गृहमंत्री होते, तेव्हा दहशतवादी घटना घडली होती. विलासराव देशमुख त्यावेळी मुख्यमंत्री होते. अशोक चव्हाण होते, जे आता भाजपात आहे. त्यांनी एखाद्या घटनेत कुणालाही पकडून आणा, आपण कोर्टात उभं राहू असा संदेश द्यायचा होता का असा प्रश्न माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला. 

दरम्यान, आम्ही कोर्टाने दिलेल्या निकालावर नाराज आहोत. हेमंत करकरे यांनी या प्रकरणाचा छडा लावून पुराव्यासह आरोपींना अटक केली होती. आज १७ वर्षांनी कोर्ट पंचनाम्यात कमतरता असल्याचे सांगते, मात्र या निर्णयाला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ. मालेगावच्या लोकांना न्याय नक्की मिळेल. आज कोर्टाने न्याय दिला नाही. आम्ही न्यायाची लढाई लढत आहोत अशी प्रतिक्रिया मालेगाव स्फोटातील पीडित कुटुंबाने दिला आहे. 

टॅग्स :Malegaon Blastमालेगाव बॉम्बस्फोटCourtन्यायालयcongressकाँग्रेसImtiaz Jalilइम्तियाज जलील