शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
2
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
3
Wife च्या नावे पोस्टाच्या या स्कीममध्ये ₹८०००, ५ वर्षांत होईल धनवर्षाव; पाहा कमाईचं संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
5
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
6
बँक, आधार ते GST पर्यंत..., आजपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; तुमच्या खिशावर अन् जीवनावर थेट परिणाम होणार!
7
“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
8
LPG Cylinder Price Cut:आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?
9
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
10
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
11
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
12
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
13
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
14
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
15
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
16
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
17
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
18
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
19
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
20
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप

१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 12:59 IST

या निर्णयाला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ. मालेगावच्या लोकांना न्याय नक्की मिळेल. आज कोर्टाने न्याय दिला नाही. आम्ही न्यायाची लढाई लढत आहोत अशी प्रतिक्रिया मालेगाव स्फोटातील पीडित कुटुंबाने दिला आहे. 

मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी १७ वर्षांनी कोर्टाने निकाल सुनावला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. यावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. जर आरोपी निर्दोष असतील तर दोषी कुठे आहेत? या निकालामुळे न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहतात अशा भावना व्यक्त करण्यात येत आहे. कोर्टाने दिलेल्या निकालावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी भाष्य केले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पहिली गोष्ट म्हणजे बॉम्बस्फोट झाला का, तर झाला. त्याचे ठिकाणही आहे. या स्फोटात लोकांचाही मृत्यू झाला. जर बॉम्बस्फोट झाला तर त्यातील आरोपी गेले कुठे या स्वाभाविक प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे. जे दोषी असतील त्यांना पकडले जाणे, त्यांना शिक्षा होणे या दृष्टीने सरकार पुढे काय करणार हा प्रश्न आहे. शहीद हेमंत करकरे यांच्यासारखा अधिकारी ज्यांना २६/११ ला देशावर झालेल्या हल्ल्यात वीरमरण आले. त्यांनी या प्रकरणाचे धागेदोरे शोधले होते. त्याचे पुढे काय झाले. त्यामुळे आता सरकारची जबाबदारी आहे स्फोटातील आरोपींना शोधले पाहिजे असं त्यांनी सांगितले. 

तर हेमंत करकरे हे देशातील चांगल्या अधिकाऱ्यांपैकी एक होते. त्यांनी हे प्रकरण काढले. या स्फोटानंतर हिंदू दहशतवाद हा शब्द पुढे आला. सामाजिक ध्रुवीकरण करण्यासाठी हा स्फोट घडवून आणला होता. मग या स्फोटामागे कोण होते? एका साध्वीला अटक केली जाते. देशातील लष्कर अधिकाऱ्याला अटक केली जाते. त्यामुळे देशाच्या न्यायव्यवस्थेवर, लष्करावर त्यावेळी प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. या खटल्याचा राजकीय फायदा घेण्याचं काम भाजपाने केले होते. प्रज्ञा सिंहला भोपाळसारख्या मतदारसंघात खासदार बनवले होते. जेव्हा आर.आर पाटील राज्याचे गृहमंत्री होते, तेव्हा दहशतवादी घटना घडली होती. विलासराव देशमुख त्यावेळी मुख्यमंत्री होते. अशोक चव्हाण होते, जे आता भाजपात आहे. त्यांनी एखाद्या घटनेत कुणालाही पकडून आणा, आपण कोर्टात उभं राहू असा संदेश द्यायचा होता का असा प्रश्न माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला. 

दरम्यान, आम्ही कोर्टाने दिलेल्या निकालावर नाराज आहोत. हेमंत करकरे यांनी या प्रकरणाचा छडा लावून पुराव्यासह आरोपींना अटक केली होती. आज १७ वर्षांनी कोर्ट पंचनाम्यात कमतरता असल्याचे सांगते, मात्र या निर्णयाला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ. मालेगावच्या लोकांना न्याय नक्की मिळेल. आज कोर्टाने न्याय दिला नाही. आम्ही न्यायाची लढाई लढत आहोत अशी प्रतिक्रिया मालेगाव स्फोटातील पीडित कुटुंबाने दिला आहे. 

टॅग्स :Malegaon Blastमालेगाव बॉम्बस्फोटCourtन्यायालयcongressकाँग्रेसImtiaz Jalilइम्तियाज जलील