शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
2
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
3
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
4
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
5
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
6
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
7
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
8
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
9
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
10
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
11
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
12
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
13
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
14
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
15
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
16
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
17
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
18
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
19
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
20
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी

१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 12:59 IST

या निर्णयाला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ. मालेगावच्या लोकांना न्याय नक्की मिळेल. आज कोर्टाने न्याय दिला नाही. आम्ही न्यायाची लढाई लढत आहोत अशी प्रतिक्रिया मालेगाव स्फोटातील पीडित कुटुंबाने दिला आहे. 

मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी १७ वर्षांनी कोर्टाने निकाल सुनावला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. यावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. जर आरोपी निर्दोष असतील तर दोषी कुठे आहेत? या निकालामुळे न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहतात अशा भावना व्यक्त करण्यात येत आहे. कोर्टाने दिलेल्या निकालावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी भाष्य केले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पहिली गोष्ट म्हणजे बॉम्बस्फोट झाला का, तर झाला. त्याचे ठिकाणही आहे. या स्फोटात लोकांचाही मृत्यू झाला. जर बॉम्बस्फोट झाला तर त्यातील आरोपी गेले कुठे या स्वाभाविक प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे. जे दोषी असतील त्यांना पकडले जाणे, त्यांना शिक्षा होणे या दृष्टीने सरकार पुढे काय करणार हा प्रश्न आहे. शहीद हेमंत करकरे यांच्यासारखा अधिकारी ज्यांना २६/११ ला देशावर झालेल्या हल्ल्यात वीरमरण आले. त्यांनी या प्रकरणाचे धागेदोरे शोधले होते. त्याचे पुढे काय झाले. त्यामुळे आता सरकारची जबाबदारी आहे स्फोटातील आरोपींना शोधले पाहिजे असं त्यांनी सांगितले. 

तर हेमंत करकरे हे देशातील चांगल्या अधिकाऱ्यांपैकी एक होते. त्यांनी हे प्रकरण काढले. या स्फोटानंतर हिंदू दहशतवाद हा शब्द पुढे आला. सामाजिक ध्रुवीकरण करण्यासाठी हा स्फोट घडवून आणला होता. मग या स्फोटामागे कोण होते? एका साध्वीला अटक केली जाते. देशातील लष्कर अधिकाऱ्याला अटक केली जाते. त्यामुळे देशाच्या न्यायव्यवस्थेवर, लष्करावर त्यावेळी प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. या खटल्याचा राजकीय फायदा घेण्याचं काम भाजपाने केले होते. प्रज्ञा सिंहला भोपाळसारख्या मतदारसंघात खासदार बनवले होते. जेव्हा आर.आर पाटील राज्याचे गृहमंत्री होते, तेव्हा दहशतवादी घटना घडली होती. विलासराव देशमुख त्यावेळी मुख्यमंत्री होते. अशोक चव्हाण होते, जे आता भाजपात आहे. त्यांनी एखाद्या घटनेत कुणालाही पकडून आणा, आपण कोर्टात उभं राहू असा संदेश द्यायचा होता का असा प्रश्न माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला. 

दरम्यान, आम्ही कोर्टाने दिलेल्या निकालावर नाराज आहोत. हेमंत करकरे यांनी या प्रकरणाचा छडा लावून पुराव्यासह आरोपींना अटक केली होती. आज १७ वर्षांनी कोर्ट पंचनाम्यात कमतरता असल्याचे सांगते, मात्र या निर्णयाला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ. मालेगावच्या लोकांना न्याय नक्की मिळेल. आज कोर्टाने न्याय दिला नाही. आम्ही न्यायाची लढाई लढत आहोत अशी प्रतिक्रिया मालेगाव स्फोटातील पीडित कुटुंबाने दिला आहे. 

टॅग्स :Malegaon Blastमालेगाव बॉम्बस्फोटCourtन्यायालयcongressकाँग्रेसImtiaz Jalilइम्तियाज जलील