शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांना सन्मानपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 06:38 IST

आणिबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांपैकी जे मानधन घेतात आणि घेत नाहीत अशा सर्वांना सन्मानपत्र दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिले.

 मुंबई : आणिबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांपैकी जे मानधन घेतात आणि घेत नाहीत अशा सर्वांना सन्मानपत्र दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिले. या बंदीजनांचे मानधन वाढविण्याचा भविष्यात निश्चितच विचार केला जाईल, असे ते म्हणाले.१९७५ ते १९७७ या आणीबाणीच्या काळात तुरूंगवास भोगलेल्यांना प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरावा, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य अजित पवार यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी सदस्य पराग अळवणी, सुभाष (पंडित) पाटील, शशिकांत शिंदे यांनीही चर्चेत सहभाग घेतला. माझे वडील, काका त्यावेळी तुरुंगात होते, आज ते नाहीत पण माझी वयोवृद्ध आई आहे. ती मानधन घेत नाही पण सरकारने तिला वा तिच्यासारख्यांना सन्मानपत्र तरी द्यायला हवे, असे शेकापचे सुभाष पाटील म्हणाले. त्यावर सन्मानपत्र देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा कमी कालावधीत तुरुंगवास भोगलेल्यांना ५ हजार, तर महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी बंदीजनांना १० हजार मानधन देण्यात येते. बंदीजनाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबास अनुक्रमे अडीच हजार व पाच हजार रुपयांचे मानधन दिले जाते. आतापर्यंत ३२६७ जणांना मानधन मंजूर करण्यात आले आहे.हे मानधन मिळण्यात अडचणी येणार नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांना त्या बाबत विशेष लक्ष देण्यास सांगितले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस