शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

राष्ट्रवादीच्या मुलाखतीला गैरहजर; संग्राम जगतापांच ठरलं ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 16:50 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी झालेल्या पक्षाच्या मुलाखतीला जगताप गैरहजर असल्याचे पहायला मिळाले.

मुंबई - लोकसभा निवडणुकीप्रमाणेच भाजप-शिवसेनेने विधानसभा निवडणुकीपूर्वी फोडाफोडीचे राजकरण सुरु केले आहे. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाला काही तास उलटले नसतानाच, आता नगर शहर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप सुद्धा राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. त्याचे कारण म्हणजे, आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी झालेल्या पक्षाच्या मुलाखतीला जगताप गैरहजर असल्याचे पहायला मिळाले.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आमदार जगताप हे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. स्वत: जगताप यांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. मी राष्ट्रवादीसोबत असून माझा शिवसेना प्रवेश या फक्त अफवा असल्याचा दावा आमदार जगताप यांनी केला होता. मात्र गुरुवारी अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या झालेल्या मुलाखतीला जगताप हे गैरहजर असल्याचे दिसून आले. त्यामुळे जगताप हे राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चा आता पुन्हा सुरु झाल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत संग्राम जगताप हे नगर शहराचे आमदार असूनही या विधानसभा मतदारसंघात खासदार सुजय विखेंनी ५३ हजार १२२ मतांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे राजकरणातील पुढील अंदाज लक्षात घेत जगताप राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चा मोठ्याप्रमाणात सुरु आहेत.

हे ही वाचा  पक्षांतरामुळे वैभव पिचडांपासून दुरावणार आदिवासी मते !

त्यातच अकोले मतदार संघाचे आमदार वैभव पिचड यांच्या पक्ष बदलाची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू आहे. पिचड हे सद्या मुंबईत आहे. तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असून त्यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित असल्याचे समजले जात आहे. अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तीन आमदार आहेत. मात्र जगताप आणि पिचड यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यास,अहमदनगर जिल्ह्यात  श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार राहुल जगताप एकमेव आमदार राष्ट्रवादीचे राहतील हे विशेष.