शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयांत गेल्या तीन दशकांपासून सुमारे ४० लाख प्रकरणे प्रलंबित; न्यायाधीशांची अपुरी संख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 02:59 IST

राज्यातील आकडेवारी : जाणूनबुजून होणारा विलंब ठरतो कारणीभूत

दीप्ती देशमुख

मुंबई : गेल्या तीन दशकांपासून राज्यातील सर्व प्रकारच्या न्यायालयांत दिवाणी व फौजदारी स्वरूपाची एकूण ४०,२४,९८५ प्रकरणे प्रलंबित आहेत. ही आकडेवारी निश्चितच झोप उडवणारी असली, तरी दिलासादायक बाब म्हणजे, याच काळात राज्यातील न्याययंत्रणेने दिवाणी व फौजदारी स्वरूपाच्या एकूण १,६२,८०,०९३ प्रकरणांचा निपटारा केला आहे. न्यायाधीशांची अपुरी संख्या, जाणूनबुजून करण्यात येत असलेला विलंब, आरोपी किंवा वकील उपस्थित नसणे, वेळेत पुरावे किंवा अर्ज दाखल न करणे, अशा अनेक बाबींमुळे केसेस चालविण्यास उशीर होत आहे.

देशातील सर्व न्यायालयांच्या कारभारावर लक्ष ठेवणाऱ्या नॅशनल ज्युडिशिअल डाटा ग्रीडनुसार, मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या एक वर्षाची माहिती सादर केली नाही. मात्र, राज्यातील सर्व कनिष्ठ न्यायालयांची माहिती त्यांच्याकडे उपलब्ध आहे. राज्यातील दिवाणी व सत्र न्यायालये, कुटुंब न्यायालये, कामगार न्यायालये, लघुवाद न्यायालये, औद्योगिक न्यायालये, सहकारी न्यायालये, किरकोळ दिवाणी केसेस, निवडणूक याचिका इत्यादी मिळून ४०,२४,९८५ प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यात दिवाणी स्वरूपाच्या १२, ५४,०५२ तर फौजदार स्वरूपाच्या २७,७०,९३३ प्रकरणांचा समावेश आहे.

गेल्या एका वर्षात दिवाणी व फौजदारी स्वरूपाची ९,९८,०३० मूळ प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत, तर ३६,९०१ अपील प्रलंबित आहेत. २,२९,८८२ अर्ज आणि ९१,२८६ आदेशांची अंमलबजावणी व्हायची असून, १,७६७ प्रकरणे ३० वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहेत. २०१५ ते २०१८ या तीन वर्षांत ५०,५२,१३४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. याच कालावधीत ५७,२०,५४६ नवी प्रकरणे न्यायालयांत दाखल करण्यात आली.

लोकांची आपल्या अधिकारांप्रती वाढलेली जागरूकता त्यांना न्यायालयांचे दरवाजे ठोठावण्यास भाग पाडते. मात्र, जितक्या प्रमाणात न्यायालयात प्रकरणे दाखल होतात, त्यांना पुरे पडण्यासाठी न्यायाधीशांची संख्या अपुरी आहे. याशिवाय आरोपीला हजर न करणे, प्रकरणांना स्थगिती मिळणे, वेळेत रेकॉडर््स व पुरावे सादर न करणे, अंमलबजावणीस उशीर होणे, अशा अनेक कारणांमुळे केसेस प्रलंबित राहतात. लाखो केसेस प्रलंबित असल्या, तरी गेल्या तीस वर्षांत दिवाणी स्वरूपाची ४२,८४,१९७ तर फौजदारी स्वरूपाची १,१९,९४,३०० प्रकरणे निकाली काढण्यात आली, म्हणजेच एकूण १,६२,८०,०९३ प्रकरणांचा निपटारा झाला आहे. गेल्या एका वर्षात २,०५,१३५ प्रकरणे निकाली काढण्यात आली.कोरोनाचा होणार विपरित परिणाममहाराष्ट्र सर्व बाबतीत अग्रेसर आहे, पण न्यायदानाची स्थिती विदीर्ण आहे. कोरोनाचे अत्यंत विपरित परिणाम न्यायदान प्रक्रियेवर होणार आहेत. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी न्यायाधीशांची रिक्त पदे भरणे व अतिरिक्त पदे निर्माण करून ती भरणे आवश्यक आहे. अन्यथा लोकांचा न्याययंत्रणेवरचा विश्वास उडेल. परदेशात लाख लोकांमागे ५५ न्यायाधीश असे प्रमाण आहे. तर भारतात लाख लोकांमागे १० ते ११ न्यायाधीश, असे प्रमाण आहे. या स्थितीबाबत आपण गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे, असे मत अ‍ॅड सतीश तळेकर यांनी व्यक्त केले.देशात ३ कोटींहून अधिक प्रकरणे प्रलंबितनॅशनल ज्युडिशियल ग्रीडनुसार, देशातील जिल्हा व तालुका न्यायालयांत एकूण ३,३०,१६,५३६ प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यात ९१,६०,८७२ दिवाणी, तर २,३८,५५,६६४ फौजदारी स्वरूपाच्या प्रकरणांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरापासून ६९,६९,११३ दिवाणी तर १,८४,६०,१३९ फौजदारी केसेस प्रलंबित आहेत. दरम्यान, गेल्या काही वर्षांत देशातील सर्व कनिष्ठ न्यायालयांनी ९,८९,४७,९५५ प्रकरणे निकाली काढली. 

टॅग्स :Courtन्यायालय