शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अब्दुल सत्तार राज्याचे कृषीमंत्री, तर संजय राठोडांकडे अन्न व औषध प्रशासन खात्याचा कार्यभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 17:50 IST

खातेवाटपात मुख्यमंत्र्यांकडे १० पेक्षा अधिक खाती, तर उपमुख्यमंत्र्यांकडे सात खात्यांचा कार्यभार.

काही दिवसांपूर्वीच राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यामध्ये शिवसेनेच्या ९ आणि भाजपच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना खातेवाटप जाहीर केलं. मुख्यमंत्र्यांकडे १० पेक्षा अधिक खात्यांचा कार्यभार असेल, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, अर्थ सारख्या महत्त्वाच्या सात खात्यांचा कार्यभार असणार आहे. दरम्यान, अब्दुल सत्तार हे आता राज्याचे नवे कृषीमंत्री असतील, तर संजय राठोड यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाची जबाबदारी असणार आहे.

काही दिवसांपूर्वीच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर कोणत्या मंत्र्यांकडे कोणती खाती असतील याची चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटप करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मुख्यमंत्री एकनाख शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभागांची जबाबदारी असणार आहे.

तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार या खात्यांचा कार्यभार असेल. काही दिवसांपूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. परंतु या विस्तारात महिला आमदारांना संधी देण्यात आली नव्हती.

हेही वाचा -  मोठी बातमी : फडणवीसांकडे गृह, तर विखेंकडे महसूल; शिंदे सरकारचं खातेवाटप जाहीर

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारSanjay Rathodसंजय राठोडEknath Shindeएकनाथ शिंदे