शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

आरक्षण वैध ठरताच आबासाहेब पाटील ढसाढसा रडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 14:06 IST

त्यांच्या डोळ्यातून आलेले आनंद अश्रू हे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या संघर्षाची आठवण करून देणारे होते.

मुंबई  - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने तब्बल २१ दिवस परळीमध्ये केलेले क्रांतिकारी ठिय्या आंदोलन राज्यभर चर्चेचा विषय ठरले होते. मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक आबासाहेब पाटील यांचा या ठिय्या आंदोलनात सिंहाचा वाटा होता. गुरुवारी मराठा आरक्षण वैध असल्याचा न्यायालयाने निकाल देताच आबासाहेब यांना अश्रू अनावर झाले आणि ते ढसाढसा रडले. एका वृत्तवाहिन्याच्या कार्यक्रमात यावेळी ते आपली प्रतिकिया देत होते.

मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने परळी येथे २१ दिवस केलेल्या ठिय्या आंदोलनाची राज्यभरात चर्चा झाली होती. यावेळी २६ पेक्षा अधिक जिल्ह्यातील समन्वयकांनी या ठीय्यात हजेरी लावली होती. या ठिय्या आंदोलनाचे नेतृत्व पुण्याचे आबासाहेब पाटील यांच्याकडे होते. गुरुवारी न्यायालयाने मराठा आरक्षण वैध असल्याच्या निकाल दिल्यांनतर आबासाहेब पाटील यांना आपले अश्रू थांबवता आले नाहीत आणि एका वृत्तवाहिन्याच्या कार्यक्रमात प्रतिकिया देताना ते ढसाढसा रडले. त्यांच्या डोळ्यातून आलेले आनंदाश्रू हे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या संघर्षाची आठवण करून देणारे होते.

खूप सकारात्मक निर्णय झाला आहे. मराठा समाजाला खूप मोठा संघर्ष करावा लागला आणि त्यांनतर हा निकाल आला आहे. मुख्यमंत्री यांचे आभार व्यक्त करतो. ३२ वर्षांच्या लढ्यानंतर अखेर मराठा समाजाला न्याय मिळाले आहे, असल्याचे पाटील म्हणाले. ४२ मराठा बांधवांच्या बलिदान आणि हजारो तरुणांवर दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर आज मराठा समाजाला आरक्षण मिळाले असल्याचे ही पाटील म्हणाले.