शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
3
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
4
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
5
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
6
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
7
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
8
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
9
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
10
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
11
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
12
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
13
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
14
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
15
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
16
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
17
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
18
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
19
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
20
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?

‘अब की बार किसान सरकार...’; तेलंगणाचे CM चंद्रशेखर राव यांचा नारा, भारत राष्ट्र समितीची नांदेडमध्ये विशाल सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 06:17 IST

भारत राष्ट्र समितीचा देशव्यापी विस्तार करण्याच्या उद्देशाने रविवारी नांदेडातील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या मैदानावर केसीआर यांची सभा झाली.

नांदेड : स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. परंतु आजही शेतकरी, कष्टकरी, सामान्य नागरिक हलाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. त्यामुळे देशात शेतकऱ्यांचे सरकार आवश्यक आहे. त्यामुळे हातात गुलाबी झेंडा घ्या अन् शेतकऱ्यांचे सरकार आणा. दोन वर्षांत महाराष्ट्रासह देशात झगमगाट दिसून येईल, असे म्हणत अब की बार किसान सरकार, अशी घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिली. भारत राष्ट्र समितीचा देशव्यापी विस्तार करण्याच्या उद्देशाने रविवारी नांदेडातील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या मैदानावर केसीआर यांची सभा झाली. यावेळी केसीआर म्हणाले, ७५ वर्षांत देशात अनेक सरकारे आली. परंतु आजही पिण्यासाठी, सिंचनासाठी पाणी नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात तर दररोज शेतकरी आत्महत्या होतात याचे दु:ख आहे. देशाचे पंतप्रधान संसदेत मोठ-मोठी भाषणे करतात. परंतु दिल्लीत अनेक महिने शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात साडेसातशे जणांचा मृत्यू झाला. त्यांच्याबद्दल मोदी एक शब्दही बोलले नाहीत. या सभेत नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, अहमदनगर, गडचिरोलीसह अनेक भागातील माजी आमदार, जिल्हा परिषद, न. प. सदस्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. 

भारतात दरवर्षी साधारणत: १ लाख ४० हजार टीएमसी पाऊस होतो.  अर्ध्या पाण्याचे बाष्पीभवन होते. जवळपास ७० ते ७५ हजार टीएमसी पाणी नद्यांमध्ये वाहते. त्यातील फक्त २० हजार टीएमसी पाण्याचा आपण उपयोग करतो, असेही केसीआर म्हणाले.

शेतकऱ्यांनी आपली ताकद ओळखावीदेशात ७५ वर्षांपैकी जवळपास ६० वर्षांहून अधिक काळ काँग्रेस आणि भाजपचे सरकार आहे. परंतु कुणीही आले तरी भाषणबाजी, कोणी किती खाल्ले, अदानी-अंबाणीच्या जवळचा कोण? हीच चर्चा होते. देशातील शेतकऱ्यांनी आपली ताकद ओळखण्याची गरज आहे. त्यासाठी एकत्र या, गुलाबी झेंडा हाती घ्या अन् आपली ताकद दाखवून किसान सरकार आणा, असे आवाहन त्यांनी केले.

सार्वजनिक कंपन्यांचे खासगीकरण हाेऊ देणार नाहीलोकांना भीती घालून खासगीकरणाचा घाट घातला जात आहे; परंतु बीआरएस जनहिताच्या एलआयसी, वीज वितरणसारख्या कंपन्यांचे कधीही खासगीकरण होऊ देणार नाही. आमचे सरकार आल्यानंतर पुन्हा यांचे राष्ट्रीयीकरण केले जाईल, असे केसीआर सभेनंतर पत्रपरिषदेत म्हणाले.

 

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावNandedनांदेडPoliticsराजकारण