शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर
2
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
3
मंदिरातून झाली 'मदिरा दान'ची घोषणा! आज सकाळपासूनच देशी दारूचा ठेक्यावर उसळली गर्दी, १० ची दिली होती वेळ...
4
₹५ लाखांचं बनतील ₹५० कोटी; ५ स्टेप फॉर्म्युला जो तुम्हाला देईल फायनान्शिअल फ्रीडम आणि अनस्टॉबेल ग्रोथ
5
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
6
Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
7
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
8
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
9
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
10
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
12
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
13
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
14
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
15
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
16
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
17
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
18
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
19
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
20
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद

‘अब की बार किसान सरकार...’; तेलंगणाचे CM चंद्रशेखर राव यांचा नारा, भारत राष्ट्र समितीची नांदेडमध्ये विशाल सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 06:17 IST

भारत राष्ट्र समितीचा देशव्यापी विस्तार करण्याच्या उद्देशाने रविवारी नांदेडातील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या मैदानावर केसीआर यांची सभा झाली.

नांदेड : स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. परंतु आजही शेतकरी, कष्टकरी, सामान्य नागरिक हलाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. त्यामुळे देशात शेतकऱ्यांचे सरकार आवश्यक आहे. त्यामुळे हातात गुलाबी झेंडा घ्या अन् शेतकऱ्यांचे सरकार आणा. दोन वर्षांत महाराष्ट्रासह देशात झगमगाट दिसून येईल, असे म्हणत अब की बार किसान सरकार, अशी घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिली. भारत राष्ट्र समितीचा देशव्यापी विस्तार करण्याच्या उद्देशाने रविवारी नांदेडातील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या मैदानावर केसीआर यांची सभा झाली. यावेळी केसीआर म्हणाले, ७५ वर्षांत देशात अनेक सरकारे आली. परंतु आजही पिण्यासाठी, सिंचनासाठी पाणी नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात तर दररोज शेतकरी आत्महत्या होतात याचे दु:ख आहे. देशाचे पंतप्रधान संसदेत मोठ-मोठी भाषणे करतात. परंतु दिल्लीत अनेक महिने शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात साडेसातशे जणांचा मृत्यू झाला. त्यांच्याबद्दल मोदी एक शब्दही बोलले नाहीत. या सभेत नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, अहमदनगर, गडचिरोलीसह अनेक भागातील माजी आमदार, जिल्हा परिषद, न. प. सदस्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. 

भारतात दरवर्षी साधारणत: १ लाख ४० हजार टीएमसी पाऊस होतो.  अर्ध्या पाण्याचे बाष्पीभवन होते. जवळपास ७० ते ७५ हजार टीएमसी पाणी नद्यांमध्ये वाहते. त्यातील फक्त २० हजार टीएमसी पाण्याचा आपण उपयोग करतो, असेही केसीआर म्हणाले.

शेतकऱ्यांनी आपली ताकद ओळखावीदेशात ७५ वर्षांपैकी जवळपास ६० वर्षांहून अधिक काळ काँग्रेस आणि भाजपचे सरकार आहे. परंतु कुणीही आले तरी भाषणबाजी, कोणी किती खाल्ले, अदानी-अंबाणीच्या जवळचा कोण? हीच चर्चा होते. देशातील शेतकऱ्यांनी आपली ताकद ओळखण्याची गरज आहे. त्यासाठी एकत्र या, गुलाबी झेंडा हाती घ्या अन् आपली ताकद दाखवून किसान सरकार आणा, असे आवाहन त्यांनी केले.

सार्वजनिक कंपन्यांचे खासगीकरण हाेऊ देणार नाहीलोकांना भीती घालून खासगीकरणाचा घाट घातला जात आहे; परंतु बीआरएस जनहिताच्या एलआयसी, वीज वितरणसारख्या कंपन्यांचे कधीही खासगीकरण होऊ देणार नाही. आमचे सरकार आल्यानंतर पुन्हा यांचे राष्ट्रीयीकरण केले जाईल, असे केसीआर सभेनंतर पत्रपरिषदेत म्हणाले.

 

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावNandedनांदेडPoliticsराजकारण