शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आधार कार्डसुद्धा बोगस; मग नक्की बदललं काय ? उद्धव ठाकरेंचा सामनातून सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 08:17 IST

'सामना'च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली आहे. 

ठळक मुद्दे 'सामना'च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली आहे. नावट आधार कार्ड बनविणारी समांतर व्यवस्थाही कार्यरत आहे. दैनंदिन जीवनात अनिवार्य केला जाणारा आधार कार्डसुद्धा बनावट ठरणार असेल तर कसं व्हायचं?,

मुंबई, दि. 12- देशात बोगस नोटांचा सुळसुळाट झाला होता यासाठी ही नोटाबंदीची कुऱ्हाड चालवून या भ्रष्टाचाराचे कंबरडे मोडले असे सरकार सांगते. मात्र नोटाबंदीनंतर लगेच दोन हजारांच्या नवीन बनावट नोटा सापडल्याच होत्या. आता बनावट आधार कार्डांचा पर्दाफाश झाला, असं सांगतानाच एकीकडे आधार कार्डांची बायोमेट्रिक पडताळणी केल्याचाही दावा केला जात आहे. त्याच वेळी बनावट आधार कार्ड बनविणारी समांतर व्यवस्थाही कार्यरत आहे. सर्वच क्षेत्रात याच पद्धतीने ‘बनावटगिरी’ सुरू असेल तर मग बदलले काय?, असा खोचक सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे . 'सामना'च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली आहे. 

एकीकडे आधार कार्डचा वापर डेबिट आणि क्रेडिट कार्डसारखा करता येईल असं सरकारकडून सांगितलं जात आहे. आधार कार्डांची बायोमेट्रिक पडताळणी केल्याचाही दावा केला जात आहे. त्याच वेळी बनावट आधार कार्ड बनविणारी समांतर व्यवस्थाही कार्यरत आहे. दैनंदिन जीवनात अनिवार्य केला जाणारा आधार कार्डसुद्धा बनावट ठरणार असेल तर कसं व्हायचं?, असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी सामनातून टीका केली आहे.

सामनाच्या संपादकीयमध्ये लिहिलं आहे की,- आधार कार्डवरून वादाचा धुरळा उडाला नाही असे होत नाही. आधार कार्डच्या सुरक्षिततेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. आधार कार्डद्वारा व्यक्तिगत माहिती ‘लीक’ झाल्याचेही आरोप झाले. आता त्यात बनावट आधार कार्डांची भर पडली आहे. देशभरात सुमारे तीन लाख बोगस आधार कार्ड असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य म्हणजे ज्या कंपनीकडे आधार कार्ड नोंदणीचे काम दिले होते त्याच कंपनीचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुंपणानेच शेत खाण्याचा हा प्रकार आहे. मध्य प्रदेशातील या रॅकेटमुळे आधार कार्डची सुरक्षितता, त्याचे पिटले जाणारे ढोल, सरकारी, बिगरसरकारी कामांमध्ये त्याची केली जात असलेली अनिवार्यता या सर्वांवरच प्रश्नचिन्ह लावले आहे. आधार कार्डच्या सुरक्षेविषयी सरकारतर्फे केला जाणारा दावाही पुन्हा एकदा पोकळ ठरला आहे. आपल्या देशात भ्रष्टाचारी यंत्रणा किती खोलवर रुजली आहे याचाही हा ‘आदर्श’ नमुना आहे.

बनावट आधार कार्डांचे रॅकेट उघड झाल्याने प्रशासनाने नवे सॉफ्टवेअर तयार केले. मात्र मध्य प्रदेशातील या कंपनीने हे नवे सॉफ्टवेअरच हॅक करणारे ऑप्लिकेशन तयार केले आणि ते बनावट आधार कार्ड बनविणाऱ्यांना विकले. तपास यंत्रणांपेक्षा चोर दोन पावले पुढे असतात असे जे म्हटले जाते त्याचाच हा मासलेवाईक दाखला म्हणायला हवा. याप्रकरणी १० जणांना अटक झाली असली तरी बनावट आधार कार्डांची वाळवी आतापासूनच लागली तर व्यक्तिगत आणि देशाची सुरक्षा पोखरून काढायला तिला वेळ लागणार नाही.

पूर्वी अनेक गैरप्रकार बोगस रेशन कार्डद्वारा केले जात. बोगस आणि घुसखोरांना मतदान ओळखपत्रे बनविण्यासाठीही बोगस रेशन कार्डचा सर्रास वापर होत आला आहे. बोगस रेशन कार्डांची जागा बनावट आधार कार्डांनी घेतली असे आता म्हणायचे का? देशात बोगस नोटांचा सुळसुळाट झाला होता यासाठी ही नोटाबंदीची कुऱ्हाड चालवून या भ्रष्टाचाराचे कंबरडे मोडले असे सरकार सांगते. मात्र नोटाबंदीनंतर लगेच दोन हजारांच्या नवीन बनावट नोटा सापडल्याच होत्या. आता बनावट आधार कार्डांचा पर्दाफाश झाला. एकीकडे आधार कार्डचा वापर डेबिट आणि क्रेडिट कार्डसारखा करता येईल असे सांगितले जात आहे. आधार कार्डांची बायोमेट्रिक पडताळणी केल्याचाही दावा केला जात आहे. त्याच वेळी बनावट आधार कार्ड बनविणारी समांतर व्यवस्थाही कार्यरत आहे. दैनंदिन जीवनात अनिवार्य केला जाणारा ‘आधार’ही बनावट ठरणार असेल तर कसे व्हायचे? सर्वच क्षेत्रात याच पद्धतीने ‘बनावटगिरी’ सुरू असेल तर मग बदलले काय?

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना